शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी नमुने घेण्यात वर्धा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:33 AM

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्दे९७.२८ टक्के काम : पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. यात वर्धा जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ९७.२८ टक्के काम करून राज्यात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील गावागावात ७ हजार ४१९ इतके पाण्याचे स्त्रोत व मालमत्ता आहे. त्यापैकी एकूण ६ हजार ४४२ पाण्याचे स्त्रोत आहेत. यात वर्धा जिल्ह्याने ७ जानेवारीपर्यंत पाण्याच्या ६ हजार २५९ स्त्रोतांच मोबाईल अप्लिकेशनद्वारे मॅपिंग करून नमुने घेण्यात आले आहे. या कामामुळेच वर्धा जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अव्वल राहिला आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून वैयक्तिक सवयी व सार्वजनिक स्वच्छता, नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष, देखभाल व दुरूस्ती या कामांमुळे पाणी दूषित होते. ते दूषित पाणी पिण्यास वापरल्यास नागरिकांना विविध आजार जडतात. नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे या उद्देशानेच पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने घेवून त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. वर्धा जिल्ह्यात हे काम जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ज्ञ गणेश सुरकार व जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक किशोर तराळे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.६,२५९ पाण्याच्या स्रोताचे घेतले नमुनेमोबाईल अप्लिकेशनद्वारे जिल्ह्यातील ६ हजार ४४२ पाण्याच्या स्त्रोतापैकी ६ हजार २५९ पाण्याच्या स्रोताचे नमुने घेण्यात आले आहेत. वर्धा तालुक्यातील १ हजार ४२० स्त्रोतांपैकी १ हजार ३६७, आर्वी तालुक्यातील ७९२ पैकी ७९२, आष्टी तालुक्यातील ४०८ पैकी ३३८, देवळी तालुक्यातील ७९९ पैकी ७९९, हिंगणघाट तालुक्यातील ८९४ पैकी ८९४, कारंजा तालुक्यातील ४१४ पैकी ३९०, समुद्रपूर तालुक्यातील ८३३ पैकी ८०२ तर सेलू तालुक्यातील ८२२ पाण्याच्या स्रोतापैकी ८२४ स्त्रोतांचे मोबाईल अप्लिकेशन द्वारे नमुने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :WaterपाणीMobileमोबाइल