शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वर्धा पोलिस अधीक्षकांचा 'ई-दरबार'; राज्यातील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:10 IST

५४ पोलिस कर्मचाऱ्यांच्या नोंदविल्या तक्रारी

वर्धा : अधिनस्त अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता वर्ध्यातील पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ‘ई-दरबार’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.

जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यांत १९ पोलिस ठाणे असून, यामध्ये शेकडो अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांच्या मेडिकल बिल, पोलिस रहिवासी क्वॉर्टरमधील सुविधा, रखडलेली पदोन्नत्ती, रखडलेली वेतनवाढ, कुटुंबीयांच्या अडचणी अशा अनेक तक्रारी असतात. या तक्रारींचा प्रवास ठाणेदार, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालय असा होत असतो. यामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्रालयीन कर्मचाऱ्यांकडून बरेचदा दिरंगाई होत असल्याने कर्मचारी व अधिकारी नाराज होतात. यामुळे या सर्वांवर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ‘ई-दरबार’ हा रामबाण उपाय शोधून काढला. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ई-दरबार घेतला.

जवळपास ५४ कर्मचाऱ्यांनी विविध तक्रारी नोंदविल्या असून, त्याची पोलिस अधीक्षक कार्यालय पोलिस अधीक्षकांसह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंद घेतली. निर्भीडपणे साऱ्यांनीच आपल्या अडचणी सांगितल्या. काही तक्रारींचे वेळीच मंत्रालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना करून निरसन केले. तर उर्वरित तक्रारींबाबत वरिष्ठस्तरावर तातडीने पाठपुरावा करून निरसन करण्याची ग्वाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली. याला मिळालेला प्रतिसाद पाहून दर महिन्याला सुनावणी घेऊन समस्या निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

वेळ वाचला अन् पादर्शकताही आली!

कर्मचाऱ्यांच्या अडचणी व तक्रारी जाणून घेण्याकरिता बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो. काही अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवत नाही; पण पोलिस अधीक्षकांचाच आदेश असल्याने सर्वच ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या ई-दरबारात सहभागी झाले. त्यांनी आपापल्या अडचणी साहेबांसमोर मांडल्याने वेळही वाचला आणि तक्रारींचा पाढा वाचण्यात आल्याने पारदर्शकताही आली.

नागरिकांसाठी ‘ई-जनता दरबार’ घेणार!

पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरिता पोलिस अधीक्षक हसन यांनी ‘ई-दरबार’ हा अनोखा उपक्रम राबविला. यामुळे टॉप टू बॉटमपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे दरमहा सुनावणी घेण्याचे जाहीर केले. या यशामुळे आता जनतेच्याही तक्रारी जाणून त्या सोडविण्याकरिता ‘ई-जनता दरबार’ घेण्याचा मानस असल्याचे नुरुल हसन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिकwardha-acवर्धा