शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वर्धा जिल्ह्यात कृषी साहित्यावरील जीएसटीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:48 PM

भारनियमनामुळेही ऊसाकरिता ठिबक सिंचनाची सोय करणे क्रमप्राप्त ठरते; पण तीन लाखांच्या ठिबक संचावरही १८ टक्के जीएसटी लावल्याने संच घ्यायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देतीन लाखाच्या ठिबक सिंचन संचावर आकारला ६० हजार जीएसटी

हर्षल तोटे।आॅनलाईन लोकमतपवनार : बोंडअळीमुळे कपाशीवर नांगर फिरवून ऊस लागवड करण्याच्या मानसिकतेत असलेल्या शेतकऱ्यांना जीएसटीमुळे फटका बसत आहे. ऊस लागवड करायची असेल तर ठिबक सिंचनचा वापर करावा, असा शासन निर्णय आहे. भारनियमनामुळेही ऊसाकरिता ठिबक सिंचनाची सोय करणे क्रमप्राप्त ठरते; पण तीन लाखांच्या ठिबक संचावरही १८ टक्के जीएसटी लावल्याने संच घ्यायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ऊस हे जास्त पाणी घेणारे पीक आहे. वेळी-अवेळी भारनियमनाने होत असल्याने सर्व क्षेत्राला एकाच वेळी पाणी देणे शक्य होत नाही. शिवाय सरीने पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होते. हे टाळण्यासाठी पवनार येथील विश्वेश्वर आंबटकर यांनी अडीच एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन साहित्याचे अंदाजपत्रक घेतले. यात त्यांना ३ लाख ३६ हजार ५० रुपये २० पैसे साहित्याची किंमत आणि १८ टक्के जीएसटीचे ६० हजार ४०० रुपये २४ पैसे, असे एकूण ३ लाख ९६ हजार ५८६ रुपये ४४ पैसे कोटेशन देण्यात आले.ठिबक सिंचनाचा वापर वाढावा म्हणून शासन एकीकडे ४५ टक्के सबसीडी देते; पण दुसरीकडे जीएसटीच्या माध्यमातून १८ टक्के वसूलही करते. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अस्मानी व सुल्तानी संकटांना तोंड द्यावे लागते. कधी शेतकरी दुष्काळात होरपळला जातो तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. यासोबतच शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने त्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतमालाचे भाव ठरविण्याचा अधिकार शासनाला आहे; पण विद्यमान परिस्थितीचा विचार न करता ते भाव ठरविले जातात. सोबतच साहित्यावर १८ टक्के जीएसटीचा अधिभार लावून त्याला संपविण्याचा खेळ तर शासन खेळत नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. शेतीपूरक साहित्यावरील जीएसटीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हा अधिभार बंद करावा वा तो नाममात्र ठेवावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मी ठिबक सिंचन संचाचे कोटेशन काढले. यात तीन लाखांवर ६० हजार रुपये जीएसटी लावला गेला. यामुळे ठिबक संच घ्यावा की नाही, असा प्रश्न पडला. योग्य भाव दिले जात नसताना कृषी साहित्यावर कर आकारला जातो, हे योग्य नाही. शासनाने ठिबक संचावरील जीएसटी रद्द वा नाममात्र करणे गरजेचे आहे.- विश्वेश्वर आंबटकर, शेतकरी, पवनार.

टॅग्स :GSTजीएसटी