शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हायटेंशन लाइनच्या खांबावर चढत मानसिक रुग्णाची विरुगिरी; तब्बल तीन तास थरार, पुलगाव स्थानकावर उडाली तारंबळ

By चैतन्य जोशी | Updated: February 17, 2024 20:56 IST

सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

वर्धा : वेळ सकाळची...रेल्वेस्थानकावर प्रवाशांची खचाखच गर्दी...अन् अचानक ओरडण्याचा आवाज आला...पाहतात तर काय एक तरुण थेट फलाटालगतच्या हायटेंशन लाइनच्या खांबावर जाऊन उभा असलेला दिसून आला. हा भयावह थरार चक्क तीन तास फलाटावर असलेल्या प्रवाशांसह रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला. सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

ही घटना १७ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुलगाव स्थानकावर घडली. पुलगाव स्थानकावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक जण पुलगाव येथून रेल्वेने नोकरीला, तसेच इतर शहरांत महाविद्यालयांत शिक्षणासाठी जातात. त्यामुळे फलाटावर मोठी गर्दी असते. अशातच सचिन मेश्राम, रा. बाभूळगाव, जि. यवतमाळ हा फलाटालगत असलेल्या रेल्वे रूळावरील हायटेंशन खांबावर चढला. तेथून आरडाओरड करीत असताना फलाटावरील प्रवाशांना ही बाब दिसली. लगेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, स्टेशन मास्तर, तसेच वर्ध्यातील आरपीएफचे निरीक्षक रामसिंग मीणा यांनी पुलगाव स्थानकावर धाव घेतली. तसेच रेल्वे कर्मचारी, नागरिकांसह पुलगाव येथील अग्निशमन दलाचे कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी हायटेंशन लाइन गेलेल्या खांबावर चढलेल्या सचिन मेश्राम याला खाली उतरण्यास सांगितले. पण, तो कुणाचेही ऐकत नसल्याने कर्मचाऱ्यांनी स्वत: जीव धोक्यात घालून हायटेंशन लाइन गेलेल्या खांबावर चढून त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरवून थेट पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वीज तारांपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे आरपीएफ निरीक्षक रामसिंग मीणा यांनी सांगितले.

तीन तास थरार अन् नागरिक भयभीतसकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत फलाटावर हा थरार सुरू होता. अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये हा सर्व प्रकार चित्रित करीत होते. एकीकडे मानसिक असलेला सचिन मेश्राम खांबावरून खाली उतरण्यास तयार नव्हता तर दुसरीकडे आरपीएम आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तब्बल तीन तास हा सर्व थरार पुलगाव स्थानकावर सुरू होता.

अनर्थ टळला...मानसिक असलेला सचिन ज्या वीज खांबावर चढला होता, तो वीज खांब हायटेंशन लाइनचा होता. अचानक तो खांबावर चढून खांबावर उभा राहिला तेव्हा तेथील नागरिकांना ही बाब दिसून आली. पण, तो चढत असताना कुणालाही का दिसले नाही, हा प्रश्न आहे. काही दूरवरूनच हायटेंशन लाइन गेली होती. जर तो त्या तारांपर्यंत पोहचला असता तर मोठा अनर्थ झाला असता. त्याला वेळीच खांबावरून खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :electricityवीजrailwayरेल्वे