शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

हायटेंशन लाइनच्या खांबावर चढत मानसिक रुग्णाची विरुगिरी; तब्बल तीन तास थरार, पुलगाव स्थानकावर उडाली तारंबळ

By चैतन्य जोशी | Updated: February 17, 2024 20:56 IST

सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

वर्धा : वेळ सकाळची...रेल्वेस्थानकावर प्रवाशांची खचाखच गर्दी...अन् अचानक ओरडण्याचा आवाज आला...पाहतात तर काय एक तरुण थेट फलाटालगतच्या हायटेंशन लाइनच्या खांबावर जाऊन उभा असलेला दिसून आला. हा भयावह थरार चक्क तीन तास फलाटावर असलेल्या प्रवाशांसह रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला. सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

ही घटना १७ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुलगाव स्थानकावर घडली. पुलगाव स्थानकावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक जण पुलगाव येथून रेल्वेने नोकरीला, तसेच इतर शहरांत महाविद्यालयांत शिक्षणासाठी जातात. त्यामुळे फलाटावर मोठी गर्दी असते. अशातच सचिन मेश्राम, रा. बाभूळगाव, जि. यवतमाळ हा फलाटालगत असलेल्या रेल्वे रूळावरील हायटेंशन खांबावर चढला. तेथून आरडाओरड करीत असताना फलाटावरील प्रवाशांना ही बाब दिसली. लगेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, स्टेशन मास्तर, तसेच वर्ध्यातील आरपीएफचे निरीक्षक रामसिंग मीणा यांनी पुलगाव स्थानकावर धाव घेतली. तसेच रेल्वे कर्मचारी, नागरिकांसह पुलगाव येथील अग्निशमन दलाचे कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी हायटेंशन लाइन गेलेल्या खांबावर चढलेल्या सचिन मेश्राम याला खाली उतरण्यास सांगितले. पण, तो कुणाचेही ऐकत नसल्याने कर्मचाऱ्यांनी स्वत: जीव धोक्यात घालून हायटेंशन लाइन गेलेल्या खांबावर चढून त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरवून थेट पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वीज तारांपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे आरपीएफ निरीक्षक रामसिंग मीणा यांनी सांगितले.

तीन तास थरार अन् नागरिक भयभीतसकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत फलाटावर हा थरार सुरू होता. अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये हा सर्व प्रकार चित्रित करीत होते. एकीकडे मानसिक असलेला सचिन मेश्राम खांबावरून खाली उतरण्यास तयार नव्हता तर दुसरीकडे आरपीएम आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तब्बल तीन तास हा सर्व थरार पुलगाव स्थानकावर सुरू होता.

अनर्थ टळला...मानसिक असलेला सचिन ज्या वीज खांबावर चढला होता, तो वीज खांब हायटेंशन लाइनचा होता. अचानक तो खांबावर चढून खांबावर उभा राहिला तेव्हा तेथील नागरिकांना ही बाब दिसून आली. पण, तो चढत असताना कुणालाही का दिसले नाही, हा प्रश्न आहे. काही दूरवरूनच हायटेंशन लाइन गेली होती. जर तो त्या तारांपर्यंत पोहचला असता तर मोठा अनर्थ झाला असता. त्याला वेळीच खांबावरून खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :electricityवीजrailwayरेल्वे