शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:59 IST

Wardha : वर्धा स्थानकावरून सुटेल चार विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्य रेल्वेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहे. एक विशेष ट्रेन कलबुरार्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष चार गाड्यांची सुविधा असणार आहे.

यात विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसन्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना सेवाग्राम, वर्धा, पुलगाव स्थानकावर थांबणार आहेत.

विशेष गाडी क्रमांक ०१२६२, ०१२६४ आणि ०१२६६ या विशेष साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२०४० नागपूर येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी ०१:२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता पोहोचेल. या गाड्या वर्धा, पुलगाव स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना विशेष गाडी क्रमांक ०२०४० साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे अशी आहे. नागरिकांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. 

वर्धा स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदीवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि विविध रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची राहणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवशी देशातील विविध प्रांतातून मुंबईत प्रचंड संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अगोदरच्या दोन-तीन दिवसांपासूनच प्रचंड गर्दी उसळते. अशात अनेक जण गावाला जाणाऱ्या किंवा गावाहून परत येणाऱ्या आपल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचतात. त्यामुळे गर्दीत भर पडून गर्दी अनियंत्रित होऊ शकते, हे ध्यानात आल्याने मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. २ डिसेंबरपासून ९ डिसेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

 

टॅग्स :nagpurनागपूरwardha-acवर्धाMumbaiमुंबईrailwayरेल्वे