शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:59 IST

Wardha : वर्धा स्थानकावरून सुटेल चार विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्य रेल्वेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहे. एक विशेष ट्रेन कलबुरार्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष चार गाड्यांची सुविधा असणार आहे.

यात विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसन्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना सेवाग्राम, वर्धा, पुलगाव स्थानकावर थांबणार आहेत.

विशेष गाडी क्रमांक ०१२६२, ०१२६४ आणि ०१२६६ या विशेष साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२०४० नागपूर येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी ०१:२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता पोहोचेल. या गाड्या वर्धा, पुलगाव स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना विशेष गाडी क्रमांक ०२०४० साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे अशी आहे. नागरिकांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. 

वर्धा स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदीवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि विविध रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची राहणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवशी देशातील विविध प्रांतातून मुंबईत प्रचंड संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अगोदरच्या दोन-तीन दिवसांपासूनच प्रचंड गर्दी उसळते. अशात अनेक जण गावाला जाणाऱ्या किंवा गावाहून परत येणाऱ्या आपल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचतात. त्यामुळे गर्दीत भर पडून गर्दी अनियंत्रित होऊ शकते, हे ध्यानात आल्याने मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. २ डिसेंबरपासून ९ डिसेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

 

टॅग्स :nagpurनागपूरwardha-acवर्धाMumbaiमुंबईrailwayरेल्वे