शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:59 IST

Wardha : वर्धा स्थानकावरून सुटेल चार विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्य रेल्वेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहे. एक विशेष ट्रेन कलबुरार्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष चार गाड्यांची सुविधा असणार आहे.

यात विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसन्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना सेवाग्राम, वर्धा, पुलगाव स्थानकावर थांबणार आहेत.

विशेष गाडी क्रमांक ०१२६२, ०१२६४ आणि ०१२६६ या विशेष साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२०४० नागपूर येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी ०१:२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता पोहोचेल. या गाड्या वर्धा, पुलगाव स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना विशेष गाडी क्रमांक ०२०४० साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे अशी आहे. नागरिकांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. 

वर्धा स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदीवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि विविध रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची राहणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवशी देशातील विविध प्रांतातून मुंबईत प्रचंड संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अगोदरच्या दोन-तीन दिवसांपासूनच प्रचंड गर्दी उसळते. अशात अनेक जण गावाला जाणाऱ्या किंवा गावाहून परत येणाऱ्या आपल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचतात. त्यामुळे गर्दीत भर पडून गर्दी अनियंत्रित होऊ शकते, हे ध्यानात आल्याने मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. २ डिसेंबरपासून ९ डिसेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

 

टॅग्स :nagpurनागपूरwardha-acवर्धाMumbaiमुंबईrailwayरेल्वे