कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करा
By Admin | Updated: June 19, 2014 00:12 IST2014-06-19T00:12:08+5:302014-06-19T00:12:08+5:30
शेतकऱ्याच्या कृषीपंपाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपली. वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनातून केली

कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करा
वर्धा : शेतकऱ्याच्या कृषीपंपाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपली. वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनातून केली असता शेतकऱ्याला अपमानास्पद वागणुक मिळाली. शिवाय खंडित केलेला वीजप्रवाह पूर्ववत न केल्याने निकसान सहन करावे लागले. या प्रकरणाची चौकशी करुन कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी निवेदनातून देवळी येथील अभियंत्या यांच्याकडे शेतकरी अब्दूल रशीद हबिबउल्लाह खान यांनी केली आहे.
निवेदनानुसार, अर्जदार खान यांची शेती मौजा अडेगाव येथे आहे. त्यांच्या शेतात दोन विहिरी असून सदर विहिरींवर विद्युत मिटर बसविण्यात आहे़ त्याचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे ३९२२४०००३०४५ आणि ३९२२४७०००३८६ असा आहे़ या मिटरला नजीकचे शेतकरी नाकट व देवराव वैद्य यांच्या शेतातील डि़पी़ वरून विद्युत प्रवाहाची जोडणी केलेली आहे़ नाकट यांच्या शेतातील डि.पी जवळील विहिर उपसन्याचे काम सुरू आहे़ खान यांनी शेतात भाजीपाला व पराटीची पिके आहेत. अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. विहिरीवर पंप आहे पण विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. यातच लगतच्या शेतातील शेतकऱ्यांकडून पाणी पुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने पाण्याअभावी पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. तसेच शेतात धुळ पेरणी केली असल्याने शेतकऱ्यास विद्युत प्रवाहाची आवश्यकता आहे़ अर्जदार शेतकऱ्याने नियमीत विद्युत देयकाचा भरणा केला आहे. यामुळे कोणतेच देयक शिल्लक नसताना या ग्राहकाला वीज वितरण कंपनीकडून नाहक त्रास दिला जात आहे. मागील काही दिवसांपासून सदर डि़पी़ वरून दोन्ही विहिरींवरील विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे. याचे काहीच कारण दिले जात नसल्याने संभ्रम आहे. तसेच पोलवरून वीज तारा शॉट असल्याने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मागणी आहे. याची तक्रार नोंद नसल्याने हा बिघाड कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)