शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदारांचा युटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 5:32 PM

आधी केला पत्राचार : आता म्हणतात, अफवांना बळी पडू नका, हा विरोधकांचा डाव

आर्वी (वर्धा) : येथील आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून माझ्या परवानगीशिवाय दिलेला निधी परत घ्या, अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. परंतु लगेच मुंबईत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आटोपून आर्वीत परतल्यावर आमदारांनी पत्रकार परिषद घेवून 'माझी कुठलीही नाराजी नाही, कोणताही निधी परत जाणार नाही. हा विरोधकांचा डाव असून या अफवांवर विश्वास ठेवू नका' असे आवाहन केले. त्यामुळे आमदारांचा हा यूटर्न आणि 'ना' राजीनाम्याची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्वीचे रहिवासी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामाकरिता निधी मंजूर करण्याचा सपाटा लावला. हा सर्व प्रकार पाहून आमदार दादाराव केचे यांनी जाहीर सभेतून आगपाखड करीत उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यावर आमदारांनी भूमिकाच बदलली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी माझे समाधान करून कारंजाकरिता मंजूर केलेला पाच कोटींचा निधी परत जाणार नाही. तसेच आष्टी व आर्वीकरिता जो निधी देणे बाकी होता, त्यावरही निर्णय झाला आहे. त्यामुळे आता राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आमदार केचे यांनी विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

नाल्या व पुलाच्या बांधकामासाठीच हा निधी नसून सर्वधर्म समभावाच्यादृष्टीने अनेक संतांच्या पावन कार्यासाठी, सर्व समाजबांधवांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही विकासकामे विरोधकांना सहन होत नसल्याने माझी बदनामी करण्याचा सर्व प्रयत्न सुरू आहे. संताजी महाराज सभागृह व इतरत्र जी कामे आहे, ती कोणतीही कामे रद्द होणार नाहीत. माझ्याबद्दल होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी तुमचाच आहे, तुम्ही माझे आहात हे लक्षात घ्या, असे भावनिक आवाहनही आमदार केचे यांनी केले. या पत्रकार परिषदेला अनिल जोशी, राजाभाऊ गिरधर, प्रशांत वानखडे, विनय डोळे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, बाळा नादुरकर, नीलेश देशमुख, जगन गाठे, राजाभाऊ वानखेडे, मिलिंद हिवाळे, दिनेश भगत, रोशन पवार आदींची उपस्थिती होती.

विरोधाचा प्रश्नच नाही

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे आणि माझ्यात कोणताही गैरसमज नाही. विकास कामांसंदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, तेव्हा ते कोणताही कागद सुमित यांच्याकडे द्यायला लावतात. त्यामुळे विरोधाचा प्रश्न उद्भवत नाही. सुमित हे विकासकामाला हातभार लावतात, असे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणDadarao Kecheदादाराव केचेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwardha-acवर्धा