शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

'व्हाइट कॉलर' वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 14:57 IST

अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे.

ठळक मुद्देवाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोन कर्त्या व्यक्तींचा बळीमृतांच्या परिवाराचा टाहो ट्रॅक्टरमालक अजूनही मोकळाच

वर्धा : गावगाड्यात लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्यांनी आता आपला मोर्चा वाळूचोरीकडे वळविला आहे. अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोन कर्त्या व्यक्तींचा बळी घेतला आहे. यापूर्वीही तालुक्यात अशा अपघातांच्या घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. पैसे कमाविण्याच्या हव्यासापोटी हे वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार? असा सवाल मृत मजुरांच्या परिवारांनी उपस्थित केला आहे.

देवळीतील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून सोनगाव शिवारातील नदी-नाल्यांतून वाळू चोरीचा गोरखधंदा सुरू केल्याचे गावकरी सांगतात. त्यांच्याच कामावर असलेले मजूर सोमवारी एम.एच. ३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळू भरण्याकरिता सोनेगाव (बाई)कडे जात होते. सकाळी सात वाजताच्या सुमारास अडेगाव येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल सुरेश लाकडे (वय ३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) या युवकांना जीव गमवावा लागला; तर पाच मजूर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून ऋतिक हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या हातमजुरीवर त्याच्या घरची चूल पेटायची; तर अनिलचीही परिस्थिती जेमतेम असून त्याला दोन लहान मुली, पत्नी, वृद्ध आई असा परिवार आहे. या दोघांच्याही मृत्यूने परिवार उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारांना आता आधार कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साधी कुटुंबीयांची विचारणाही केली नाही!

घटनेच्या दिवशी पहाटे पाच वाजता ट्रॅक्टरमालक गौतम पोपटकर यांच्या सांगण्यावरून मृत अनिल व ऋतिक या दोघांनाही झोपेतून उठवून नेले होते. तसेच घटना घडल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करूनही पोपटकर यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच साधी माणुसकी म्हणून विचारणाही केली नसल्याचे मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ट्रॅक्टरमालक यांच्यावर अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त होत असून, तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

वाळू चोरी हा गुन्हा नाही का

अपघातग्रस्त टॅक्टरची कागदपत्रे, गाडीचे नॉमिनेशन, गाडीचा इन्शुरन्स, तसेच इतर कागदपत्रांबाबतची माहिती आरटीओकडून घेऊन तपास केला जात असल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली आहे. या कागदपत्रांत तफावत आढळून आल्यास गाडी मालक पोपटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे; पण हे मजूर मालकांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर घेऊन वाळू चोरीकरिता जात होते. यादरम्यान अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला. त्यामुळे वाळूचोरी हा गुन्हा ठरत नाही का? परिणामी ट्रॅक्टर मालकही आरोपी नाही का? असा प्रश्न देवळीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.

अटकपूर्व जामिनासाठी साथ?

यापूर्वी वाळूच्या वाहनाखाली दबून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाहन चालक व मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याही प्रकरणामध्ये ट्रॅक्टर मालक पोपटकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोपटकर यांना अटकेपासून वाचविण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तर पोलीस मोकळीक देत नाही ना, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असल्याने पोलिसांप्रती संशयाचे वलय निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीAccidentअपघातDeathमृत्यू