शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

'व्हाइट कॉलर' वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 14:57 IST

अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे.

ठळक मुद्देवाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोन कर्त्या व्यक्तींचा बळीमृतांच्या परिवाराचा टाहो ट्रॅक्टरमालक अजूनही मोकळाच

वर्धा : गावगाड्यात लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्यांनी आता आपला मोर्चा वाळूचोरीकडे वळविला आहे. अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोन कर्त्या व्यक्तींचा बळी घेतला आहे. यापूर्वीही तालुक्यात अशा अपघातांच्या घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. पैसे कमाविण्याच्या हव्यासापोटी हे वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार? असा सवाल मृत मजुरांच्या परिवारांनी उपस्थित केला आहे.

देवळीतील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून सोनगाव शिवारातील नदी-नाल्यांतून वाळू चोरीचा गोरखधंदा सुरू केल्याचे गावकरी सांगतात. त्यांच्याच कामावर असलेले मजूर सोमवारी एम.एच. ३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळू भरण्याकरिता सोनेगाव (बाई)कडे जात होते. सकाळी सात वाजताच्या सुमारास अडेगाव येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल सुरेश लाकडे (वय ३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) या युवकांना जीव गमवावा लागला; तर पाच मजूर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून ऋतिक हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या हातमजुरीवर त्याच्या घरची चूल पेटायची; तर अनिलचीही परिस्थिती जेमतेम असून त्याला दोन लहान मुली, पत्नी, वृद्ध आई असा परिवार आहे. या दोघांच्याही मृत्यूने परिवार उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारांना आता आधार कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साधी कुटुंबीयांची विचारणाही केली नाही!

घटनेच्या दिवशी पहाटे पाच वाजता ट्रॅक्टरमालक गौतम पोपटकर यांच्या सांगण्यावरून मृत अनिल व ऋतिक या दोघांनाही झोपेतून उठवून नेले होते. तसेच घटना घडल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करूनही पोपटकर यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच साधी माणुसकी म्हणून विचारणाही केली नसल्याचे मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ट्रॅक्टरमालक यांच्यावर अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त होत असून, तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

वाळू चोरी हा गुन्हा नाही का

अपघातग्रस्त टॅक्टरची कागदपत्रे, गाडीचे नॉमिनेशन, गाडीचा इन्शुरन्स, तसेच इतर कागदपत्रांबाबतची माहिती आरटीओकडून घेऊन तपास केला जात असल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली आहे. या कागदपत्रांत तफावत आढळून आल्यास गाडी मालक पोपटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे; पण हे मजूर मालकांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर घेऊन वाळू चोरीकरिता जात होते. यादरम्यान अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला. त्यामुळे वाळूचोरी हा गुन्हा ठरत नाही का? परिणामी ट्रॅक्टर मालकही आरोपी नाही का? असा प्रश्न देवळीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.

अटकपूर्व जामिनासाठी साथ?

यापूर्वी वाळूच्या वाहनाखाली दबून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाहन चालक व मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याही प्रकरणामध्ये ट्रॅक्टर मालक पोपटकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोपटकर यांना अटकेपासून वाचविण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तर पोलीस मोकळीक देत नाही ना, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असल्याने पोलिसांप्रती संशयाचे वलय निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीAccidentअपघातDeathमृत्यू