शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सेवाग्रामातील वृक्षतोड, देशभरातील गांधीजन एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 2:46 PM

सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त करीत ही वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी देशभरातील गांधीजन एकवटले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गांधी स्मारक निधीव्दारे ‘शांतीपथ’ची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त करीत ही वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी देशभरातील गांधीजन एकवटले आहे. या मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वैचारिक वारसा लक्षात घेऊन या मार्गाला ‘शांतीपथ’ म्हणून विकसित करावे, अशी मागणी गांधी स्मारक निधीव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गांधी स्मारक निधी, दिल्ली या अग्रणी संस्थेद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना पाठविलेल्या निवेदनात देशातील गांधी विचारकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १९४० च्या दशकात गांधीजींच्या नेतृत्वात ज्येष्ठ सहकारी प्रभाकर जोसेफ, आर्यनायकम, आण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी ग्रामवासीयांना सोबत घेऊन वर्धा सेवाग्राम मार्गावर असंख्य झाडे लावली आणि जगवली. यात प्रामुख्याने कडुलिंबाचीही झाडे होती. गांधीजींच्या पर्यावरणप्रेमाची जगाला साक्ष देणाऱ्या या आश्रमाकडे जाणारा हा रस्ता साधेपणा जोपासणारा, अल्प खर्चाचा आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारा असावा, अशी विनंती या निवेदनातून केली आहे.

वृक्ष बचाओ नागरिक समितीच्या अभियंता चमूने नवनिर्माणाधीन रस्त्याचा सखोल अभ्यास करून सुधारणा सुचविणारा एक अहवाल सादर केला आहे. या अहवालाचा संदर्भ देत रस्त्याची रुंदी १० मीटर ठेऊन या मार्गावरील कापल्या जाणाऱ्या ६९ वृक्षांसह रस्त्यालगतची तब्बल २३५ झाडे वाचविण्याचा पर्याय या निवेदनातून गांधीजनांनी दिला आहे. केवळ सेवाग्राम व वर्ध्यातीलच नव्हे तर देशभरातील वृक्षतोड थांबवून गांधींच्या तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करावा, अशी हाक देशातील ज्येष्ठ गांधीविचारकांनी दिली आहे.

या गांधी विचारकांचा पुढाकारगांधी स्मारक निधीचे केंद्रीय अध्यक्ष रामचंद्र राही, राधा भट्ट (दिल्ली), के.एम.नटराजन (तामिळनाडू), संतोष गोइदी, गुजरात विद्यापीठातील विचारक दिना पटेल (अहमदाबाद), कुमार शुभमूर्ती (बिहार), धिरुभाई मेहता (मुंबई), सर्वोदय मंडळाच्या आशा बोथरा (राजस्थान), पर्यावरणतज्ज्ञ जया मित्रा (पश्चिम बंगाल), राष्ट्रीय गांधी संग्रहालयाचे ए. अन्नामलाई, राष्ट्रीय युवा संघटनचे कुमार प्रशांत, विश्वजीत रॉय (दिल्ली), के. जी. जगदीशन (केरळ), सोपान जोशी, शोभा सुपेकर (पुणे), सोशल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डी.एम. दिवाकर, प्रा. ए. एन. सिन्हा (पाटणा), नयन भंडारी शर्मा (आसाम), सर्व सेवा संघाचे अमरनाथ भाई (वाराणशी), डॉ. वर्षा दास, जी. बी. शिवराजू (बंगलोर) यांच्यावतीने गांधी स्मारक निधीचे केंद्रीय सचिव संजय सिन्हा यांनी वृक्षतोड थांबविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम