शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी तोडणार शहरांची रसद ! १ जूनपासून बळीराजाचा जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:56 IST

गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.

सेवाग्राम (वर्धा) - गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. २२ राज्यांतील शेतकरी १ ते १० जून या काळात संपावर जाणार असून १२८ शहरांत भाजीपाला, अन्नधान्य, दूध व इतर शेतमालाचा पुरवठा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी देशभरातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन राष्टÑीय किसान महासंघाची स्थापना केली आहे. या महासंघाने संपाची हाक दिली. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी वर्धा येथे महासंघाची देशव्यापी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील होते. या बैठकीला शिवकुमार शर्मा, गुरजाम चंढूणी, डॉ. बुधाजीराव मुळीक, संतबीर सिंग, सुरेश कौच, राजकुमार गुप्ता, रणजीत राजू, महेश सिंग, अभिमन्यू कोहाड, लक्ष्मण बंगे, श्रीकांत तराळ, के.बी. बिजू, प्रदीप नागपूरकर, कमल सावंत, शंकर दरेकर, सतीश कानवडे, विजय काकडे, राजू झेबीयर, प्रदीप बिलोरे यांच्यासह २२ राज्यांतून १३० प्रतिनिधी उपस्थित होते.नेमके काय असेल आंदोलनाचे स्वरूप?२२ राज्यातील १२८ शहरांमध्ये हा संप होणार असून यात नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे या शहरांचा समावेश आहे. या संपादरम्यान शेतकरी आपला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरांमध्ये विक्रीस पाठविणार नाहीत. तसेच शहरातील कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणार नाहीत.कोणत्याही शेतमालाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण खबरदारी राष्ट्रीय किसान महासंघ घेत असून केवळ ठरलेली शहरे वगळून इतर शहरे व गावांत शेतमाल विक्री करता येणार आहे.हे संपूर्ण आंदोलन अंहिसेच्या मार्गानेच केले जाणार आहे. सरकारने याबाबत काही वेगळी भूमिका घेतली तर निर्माण होणाºया परिस्थितीला सरकारच जबाबदार राहिल, असे महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शेतकºयांना जे काही मागायचे आहे, ते कायद्याने मागायचे आहे. कायदा संमत होणे आवश्यक आहे. हीच भूमिका आपण राष्टÑीय परिषदेत मांडली. जगातील अनेक देशांत अस्मानी, सुलतानी संकटे येतात; पण त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंटचे कायदे आहेत. भारतातही शेतीसाठी असा कायदा संमत होणे गरजेचे आहे.- डॉ. बुधाजीराव मुळीक, शेतीतज्ज्ञ व सदस्य, महाराष्टÑ कोअर कमिटी.असे आहेत टप्पे५ जून : केंद्र शासनाचा धिक्कार दिवस६ जून : मंदसौर (मध्यप्रदेश) येथे गतवर्षी गोळीबारामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकºयांसाठी श्रद्धांजली सभा व शेतकरी विरोधी शासन व्यवस्थेचे श्राद्ध८ जून : असहकार आंदोलन९ जून : सामूदायिक उपोषण१० जून : भारत बंदप्रमुख मागण्या काय आहेत?-खतांचे अनुदान थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करा. सरसकट शेतकºयांचा सातबारा कोरा करा- सेंद्रिय शेतीसाठी एकरी ८ हजारांचे अनुदान द्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या- गोहत्या बंदी कायदा मागे घ्या- गाईच्या दुधाला १०० तरम्हशीच्या दुधाला ८० रुपये भाव द्या

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीStrikeसंपIndiaभारत