टमाटरच्या भाववाढीने ग्राहक झालेत ‘लाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:06+5:30

भाज्यांचे भाव कडाडले आहेत. संचारबंदी लागू असूनही हातगाडीवाले वॉर्डावॉर्डात फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदीचा फायदा व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. एक किलो टमाटर घ्यायचे असेल तर ८० रुपये किलो दिले जात आहेत, तर एक पाव घ्यायचे असेल तर पंचवीस रुपये दिले जाते. तर इतरही भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

Tomato prices rise, consumers turn 'red' | टमाटरच्या भाववाढीने ग्राहक झालेत ‘लाल’

टमाटरच्या भाववाढीने ग्राहक झालेत ‘लाल’

ठळक मुद्देशंभर रुपये किलो : इतर भाज्याही कडाडल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वीत संचारबंदी लागू असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. एवढेच नव्हे, तर भाजीपाला मिळत नसल्याने संचारबंदीत सर्व भाजी भाजार बंद असल्याने टमाटरच्या भावाने उसळी घेतली असून शंभर रुपये किलोप्रमाणे खरेदी करावे लागत आहेत. इतरही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. संचारबंदी लागू असूनही हातगाडीवाले वॉर्डावॉर्डात फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदीचा फायदा व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे.
एक किलो टमाटर घ्यायचे असेल तर ८० रुपये किलो दिले जात आहेत, तर एक पाव घ्यायचे असेल तर पंचवीस रुपये दिले जाते. तर इतरही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे, ३० रुपये किलो, बटाटे ४० रुपये किलो, तर उर्वरित भाजीपाला पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून गृहिणींचे बजेट बिघडले आहे.

आजपासून श्रावण मास
सोमवारपासून हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासाची सुरुवात होत आहे. तसेच जिवती हा सणही आहे. आर्वीत आठ दिवसापासून संचारबंदी असल्याने मांसविक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेकजण घरातूनच हा व्यवसाय करीत आहे. श्रावण मासात अनेकजण मांसाहार करीत नाही. त्यामुळे रविवार हा अखेरचा दिवस असल्याने मांसविक्रीचे प्रमाण जास्त होते.

Web Title: Tomato prices rise, consumers turn 'red'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.