शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

गांधी जिल्ह्याच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 8:46 PM

मतदान होऊन १ महिना ११ दिवसांनंतर मतमोजणी होऊ घातली आहे. गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील निकालावरून चर्चेची रणधुमाळी रंगली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देमतदारराजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कुणाच्या विजयाचा होणार जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदान होऊन १ महिना ११ दिवसांनंतर मतमोजणी होऊ घातली आहे. गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील निकालावरून चर्चेची रणधुमाळी रंगली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे.काँग्रेसला हिंगणघाट व देवळी, पुलगाव या दोन मतदारसंघात आघाडी मिळण्याची आशा आहे. शिवाय, दलित, मुस्लिम व कुणबी समाजाची गठ्ठा मते मिळाल्याने काँग्रेसचा विजय सुनिश्चित असल्याचा दावा करण्यात येत आहे, तर भाजपनही सर्वच मतदार संघात पक्षाला आघाडी मिळेल, असा दावा केला आहे. मोर्शी या विधानसभा क्षेत्रात भाजपला सर्वाधिक मताधिक्याची आशा आहे. काही लोक भाजप विजयी उमेदवाराचे मताधिक्य ६० हजार ते १ लाखापर्यंत राहील, असा दावा करीत आहे. तर काही लोक वर्धा मतदारसंघात खूपच काट्याची लढत झाल्याचे सांगत आहेत. बहुजन समाज पक्षाला किमान १ लाखावर मते मिळतील काय, याबाबतही चर्चा आहे. हत्तीची मते काँग्रेसने खेचून नेली, असा दावा काँग्रेस करीत आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपचे ३ व काँग्रेसचे ३ आमदार आहेत. त्यामुळे त्या-त्या विधानसभा मतदारसंघात आघाडीची उमेदवारांना आशा आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या २ ते ३ एक्झिट पोलने भाजप तर एका एक्झिट पोलने काँग्रेस विजयी होईल, असा दावा केला आहे. या परिस्थितीत मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, मतमोजणीनंतरच निकाल कळेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९wardha-pcवर्धा