शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

यंदाही अक्षयतृतियेचा मुहूर्त हुकला; विवाहसोहळे लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील विवाहेच्छुुकांनी अक्षय तृतीयेसह मे महिन्यातील शुभ तिथीवर साध्यापद्धतीने विवाह उरकविण्याचे नियोजन केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला ८ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे अनेकांना अक्षय तृतीयेला विवाह करण्यासाठी तयारी चालविली होती. मात्र, हा लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढविल्याने ‘शुभ’ मुहूर्तावरील ‘विवाह’ सोहळ्यांवर विरजन पडले आहे. 

ठळक मुद्देशंभरावर विवाह रद्द : वर-वधू पित्यांचा खर्चावर पाणी, आता विवाहेच्छुुकांना केवळ प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या प्रकोपामुळे धुमधडाक्यात विवाह सोहळा उरकविण्याच्या पद्धतीला गेल्यावर्षीपासून ब्रेक लागला आहे. यावर्षी नाही तर पुढल्यावर्षी विवाहाचा धडाक्यात बार उडवावा, अशी अनेकांनी आशा बाळगली होती. परंतु यावर्षीही कोरोनाने पिच्छा पुरविल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतियेच्या शुभ मुहूर्तावर विवाहांची धूम असते पण, गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही कडक निर्बंध असल्याने हा महत्वाचा मुहूर्त हुकला. कडक निर्बंधामुळे या मुहूर्तावर होणारे शंभरावर विवाह रद्द करावे लागल्याने वर-वधू पित्यांचा खर्चही व्यर्थ ठरला.जिल्ह्यातील विवाहेच्छुुकांनी अक्षय तृतीयेसह मे महिन्यातील शुभ तिथीवर साध्यापद्धतीने विवाह उरकविण्याचे नियोजन केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला ८ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे अनेकांना अक्षय तृतीयेला विवाह करण्यासाठी तयारी चालविली होती. मात्र, हा लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढविल्याने ‘शुभ’ मुहूर्तावरील ‘विवाह’ सोहळ्यांवर विरजन पडले आहे. आता या कालावधीत गावखेड्यातही विवाह करता येणार नाहीत. प्रत्येक गावामध्ये प्रशासनाचे भरारी पथक घिरट्या घालत आहेत. सोबतच सरपंच, पोलिस पाटील व  तलाठी यांनाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. त्यामुळे  कारवाईला समोरे जाण्यापेक्षा विवाह समारंभ नको रे बाबा! अशीच भूमिका वर-वधू पक्षांनी घेतल्याचे दिसून येत आहे. 

मे महिन्यात आहे हे मुहूर्तएप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत ३७ मुहूर्त आहेत. त्यापैकी मे महिन्यामध्ये शुभ दिवस अधिक आहेत. मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तासह १३, १५, २१, २२, २३, २६, २९, ३० व ३१ मे या दिवशी चांगली तिथी आहेत. जूनमध्ये १५ तर जुलैमध्ये सात मुहूर्त आहेत.

विवाहसोहळ्यात नियमाचा येतोय अडसरजिल्ह्यात विवाहसोळ्यासाठी नियमांचा मोठ्या प्रमाणात अडसर ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली. त्यानंतर विवाहाकरिता दोन तासाचा कालावधी देण्यात आला. यातच जिल्ह्यामध्ये वऱ्हाड्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्याने अनेकांनी विनापरवानगी विवाह करण्यावर भर दिला. बऱ्याच नातेवाईकांनी जिल्ह्याबाहेर जाऊन शेतशिवारात विवाहसोहळा उरकविला.

यंदाही कर्तव्य नाहीच...

विवाह ठरला पण, या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी आल्याने तो वारंवार पुढे ढकलावा लागला. सुरुवातीला ४ मे रोजी विवाह निश्चित करुन तयारीला सुरुवात केली होती. परंतु सुरुवातीला १३ मे पर्यंत कडक निर्बध लादल्याने ती तारीख रद्द करुन १४ मे ही तारिख ठरविली. पण, लॉकडाऊन आणखी वाढल्याने ही तारिख सुद्धा रद्द करावी लागली. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.- संकेत प्र. आगलावे, वर्धा. 

मुलाच्या विवाहाची तारीख १६ मार्च ठरवून सर्व तयारी पूर्ण झाली होती. मुलगाही सुट्या टाकून वर्ध्यात आला. पण, लॉकडाऊनमुळे ५ एप्रिल, २२ एप्रिल या तारखाही रद्द कराव्या लागल्यात. १३ मेपर्यंत कडक निर्बंध राहणार म्हणून १४ मे ही तारीख निश्चित केली. पण, आता मुदतवाढ झाल्याने तिही रद्द करावी लागली. विवाह कधी करावा हा प्रश्नच आहे.- अरविंद वि. मिस्किन, दहेगाव (मि.)

मंगल कार्यालयांचे   आर्थिक गणित बिघडले- जिल्ह्यात दोनशे मंगल कार्यालये व लॉन असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर सेवा व्यवसायिकांना गेल्या वर्षीपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.- विवाहाकरिता आरटीपीसीआर चाचणी, पोलीस परवानगी आदी अटी असल्याने बहुसंख्य नागरिकांनी मंगल कार्यालयात विवाह करण्याकडे पाठ फिरविली आहे.- आता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काहींनी मंगलकार्यालयात बुकींग केले होते. पण, कडक निर्बंधामुळे तेही रद्द झाल्याने मंगल कार्यालयाचा व्यवसाय अडचणीत आला आहे.- वर्षभरात एकही विवाह न झाल्याने मंगलकार्यालयाच्या स्वच्छतेचा खर्च, विद्युत बिल, ग्रामपंचातय व नगरपालिकेचा कर, बँकांचे हप्ते आदी थकल्याने आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या