शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

दिंदोडा बॅरेजविरूद्ध ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 24, 2017 01:57 IST

जलसंधारण विभाग व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ चंद्रपूरमार्फत प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्पासाठी

शेतकरी, ग्रामस्थांचा विरोध : अल्प मोबदला देत घेतल्या जमिनीहिंगणघाट : जलसंधारण विभाग व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ चंद्रपूरमार्फत प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्पासाठी १९९७-९८ मध्ये जमिनी संपादित केल्या. १९९९-२००० मध्ये यापोटी अत्यल्प मोबदला देण्यात आला; पण प्रकल्पाचे काम न झाल्याने त्या जमिनींवर शेतकऱ्यांचा ताबा आहे. या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या, या मागणीसाठी मंगळवारी प्रकल्पस्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.दिंदोडा बॅरेजकरिता संपादित शेत जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे. या जमिनीवर शेतकऱ्यांचाच ताबा आहे. सदर शेतजमिन संपादित करताना निपॉन डेन्रो या खासगी कपंनीने घेतली होती. तो निपॉन डेन्रो प्रकल्प बारगळल्याने ही जमीन शासनाने परस्पर पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. आता शासन दिंदोडा बॅरेज प्रकल्पाच्या निर्मितीचा घाट घालत आहे. औद्योगिक वापरासाठी पाणी मिहावे या उद्देशाने बॅरेजची निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मते, नमूद प्रकल्पासाठी २० वर्षांपूर्वी अत्यंत कमी दरामध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. पुर्वजांनी आम्हाला या प्रकल्पापासून फायदा होईल, अशी आशा दाखविली होती. यावरूनच शासनाच्या कामांत मदत केली होती; पण या जमिनीवर प्रकल्प उभा झाला नाही. यात शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ही जमीन प्रकल्पबाधीत शेतकरी वाहत असून ती त्यांच्या ताब्यात आहे. यामुळे भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ (कलम २४-२) नुसार १९९९-२००० मध्ये झालेले अधिग्रहण रद्द होण्यास पात्र आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर संस्थेने ज्या प्रयोजनार्थ जमीन संपादित केली आहे त्या कामाकरिता पाच वर्षेपर्यंत वापरली गेली नाही तर ती जमीन शेतकऱ्याला परत करावी, असे कलम २४-२ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. यामुळे सदर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या, अशी माणगी करण्यात येत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रकल्प बाधितांनी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची स्थापना केली. समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे असून त्यांच्या नेतृत्वात मंगळवरी प्रकल्पस्थळी एकदिवसीय ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे अनुयायी विलास भोंगाडे तसेच समीक्षा गणवीर यांची उपस्थिती होती. मेधा पाटकर यांनी आंदोलनच्या दिवशी दूरध्वनीवरून दुपारी २ वाजता पाठींबा दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा तिजारे यांनी दिला. शासनाचा कोणताही प्रतिनिधी आंदोलनस्थळी निवेदन घेण्यास न आल्याने शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.आंदोलनात डॉ. विजय देवतळे, समितीचे उपाध्यक्ष अभिजीत मांडेकर, सचिव चंफत साळवे, कोषाध्यक्ष भिडकर, मनोज कोसुरकार, प्रकाश मुथा, गिरडकर, भेदुरकर, रामदास ठोंबरे, मनोज तेलंग, बोंडे आदी सहभागी झाले.(तालुका प्रतिनिधी)