शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दिंदोडा बॅरेजविरूद्ध ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 24, 2017 01:57 IST

जलसंधारण विभाग व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ चंद्रपूरमार्फत प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्पासाठी

शेतकरी, ग्रामस्थांचा विरोध : अल्प मोबदला देत घेतल्या जमिनीहिंगणघाट : जलसंधारण विभाग व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ चंद्रपूरमार्फत प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्पासाठी १९९७-९८ मध्ये जमिनी संपादित केल्या. १९९९-२००० मध्ये यापोटी अत्यल्प मोबदला देण्यात आला; पण प्रकल्पाचे काम न झाल्याने त्या जमिनींवर शेतकऱ्यांचा ताबा आहे. या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या, या मागणीसाठी मंगळवारी प्रकल्पस्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.दिंदोडा बॅरेजकरिता संपादित शेत जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे. या जमिनीवर शेतकऱ्यांचाच ताबा आहे. सदर शेतजमिन संपादित करताना निपॉन डेन्रो या खासगी कपंनीने घेतली होती. तो निपॉन डेन्रो प्रकल्प बारगळल्याने ही जमीन शासनाने परस्पर पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. आता शासन दिंदोडा बॅरेज प्रकल्पाच्या निर्मितीचा घाट घालत आहे. औद्योगिक वापरासाठी पाणी मिहावे या उद्देशाने बॅरेजची निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मते, नमूद प्रकल्पासाठी २० वर्षांपूर्वी अत्यंत कमी दरामध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. पुर्वजांनी आम्हाला या प्रकल्पापासून फायदा होईल, अशी आशा दाखविली होती. यावरूनच शासनाच्या कामांत मदत केली होती; पण या जमिनीवर प्रकल्प उभा झाला नाही. यात शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ही जमीन प्रकल्पबाधीत शेतकरी वाहत असून ती त्यांच्या ताब्यात आहे. यामुळे भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ (कलम २४-२) नुसार १९९९-२००० मध्ये झालेले अधिग्रहण रद्द होण्यास पात्र आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर संस्थेने ज्या प्रयोजनार्थ जमीन संपादित केली आहे त्या कामाकरिता पाच वर्षेपर्यंत वापरली गेली नाही तर ती जमीन शेतकऱ्याला परत करावी, असे कलम २४-२ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. यामुळे सदर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या, अशी माणगी करण्यात येत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रकल्प बाधितांनी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची स्थापना केली. समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे असून त्यांच्या नेतृत्वात मंगळवरी प्रकल्पस्थळी एकदिवसीय ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे अनुयायी विलास भोंगाडे तसेच समीक्षा गणवीर यांची उपस्थिती होती. मेधा पाटकर यांनी आंदोलनच्या दिवशी दूरध्वनीवरून दुपारी २ वाजता पाठींबा दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा तिजारे यांनी दिला. शासनाचा कोणताही प्रतिनिधी आंदोलनस्थळी निवेदन घेण्यास न आल्याने शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.आंदोलनात डॉ. विजय देवतळे, समितीचे उपाध्यक्ष अभिजीत मांडेकर, सचिव चंफत साळवे, कोषाध्यक्ष भिडकर, मनोज कोसुरकार, प्रकाश मुथा, गिरडकर, भेदुरकर, रामदास ठोंबरे, मनोज तेलंग, बोंडे आदी सहभागी झाले.(तालुका प्रतिनिधी)