शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

सांगा... आम्ही शाळेत जायचं तरी कसं? रस्ता, पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्याची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 17:14 IST

वर्धा जिल्ह्यातील वास्तव : पावसाळ्यात शाळा बंद, आता नदी-नाल्यांतून पायपीट

वर्धा : देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील अनेक गावे, तांडे व वस्त्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याने नागरिकांनी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे, जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील हेटी हे गाव होय. गावात रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची शाळा बुडतेच, त्यानंतरही नदी, नाले ओलांडून शाळा गाठावी लागत आहे.

सुसुंद्रा गावालगतच हेटी हे गाव असून लोकसंख्या शंभरावर आहे. सुसुंद्रा गावापासून हेटीपर्यंतचे अंतर दोन किलोमीटरचे असून, दरम्यान दोन नाले आहेत. हेटीपर्यंत जाण्याकरिता रस्ता नाही. नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात सुसुंद्रा आणि हेटी या गावांचा संपर्क तुटतो. हेटी या गावापासून पुढे गेल्यानंतर नदी असून, नदीच्या पलीकडे नागपूर जिल्ह्याची सीमा आहे. हेटी येथील ग्रामस्थांना सुसुंद्रा या गावाकडे येण्यासाठी पक्का रस्ता नाही.

गावातील सुमारे १७ विद्यार्थी सुसुंद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतात. काही युवक-युवती कारंजा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्यांना दररोज ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही नाल्यांना पूर राहत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावकऱ्यांनी वारंवार रस्ता व पुलाची मागणी केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रसूतीकरिता तीन महिन्यांपूर्वीच सोडावे लागते गाव

हेटीवासींची पावसाळ्यात मोठी पंचाईत होते. गावात एखादा आजारी पडल्यास त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या महिलेची प्रसूती होणार असेल तर तिला तीन महिने आधीच गाव सोडून नातेवाइकांकडे मुक्कामी पाठवावे लागते. गावात जाण्याकरिता दुसरा रस्ता नसल्यामुळे अडचणीत चांगलीच भर पडली आहे. शेतीकरिता लागणारी खते, बियाणे, औषधी आदी साहित्य पावसाळ्यापूर्वी आणून ठेवावे लागते.

सुसुंद्रा-हेटी गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गावात आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागतो. शेती साहित्य नेण्याची, मुलांना शाळेत जायची अडचण आहे. गावात नागरी सुविधा देण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी असून, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

- राहुल फुले, उपसरपंच

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाwardha-acवर्धा