शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सांगा... आम्ही शाळेत जायचं तरी कसं? रस्ता, पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्याची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 17:14 IST

वर्धा जिल्ह्यातील वास्तव : पावसाळ्यात शाळा बंद, आता नदी-नाल्यांतून पायपीट

वर्धा : देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील अनेक गावे, तांडे व वस्त्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याने नागरिकांनी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे, जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील हेटी हे गाव होय. गावात रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची शाळा बुडतेच, त्यानंतरही नदी, नाले ओलांडून शाळा गाठावी लागत आहे.

सुसुंद्रा गावालगतच हेटी हे गाव असून लोकसंख्या शंभरावर आहे. सुसुंद्रा गावापासून हेटीपर्यंतचे अंतर दोन किलोमीटरचे असून, दरम्यान दोन नाले आहेत. हेटीपर्यंत जाण्याकरिता रस्ता नाही. नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात सुसुंद्रा आणि हेटी या गावांचा संपर्क तुटतो. हेटी या गावापासून पुढे गेल्यानंतर नदी असून, नदीच्या पलीकडे नागपूर जिल्ह्याची सीमा आहे. हेटी येथील ग्रामस्थांना सुसुंद्रा या गावाकडे येण्यासाठी पक्का रस्ता नाही.

गावातील सुमारे १७ विद्यार्थी सुसुंद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतात. काही युवक-युवती कारंजा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्यांना दररोज ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही नाल्यांना पूर राहत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावकऱ्यांनी वारंवार रस्ता व पुलाची मागणी केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रसूतीकरिता तीन महिन्यांपूर्वीच सोडावे लागते गाव

हेटीवासींची पावसाळ्यात मोठी पंचाईत होते. गावात एखादा आजारी पडल्यास त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या महिलेची प्रसूती होणार असेल तर तिला तीन महिने आधीच गाव सोडून नातेवाइकांकडे मुक्कामी पाठवावे लागते. गावात जाण्याकरिता दुसरा रस्ता नसल्यामुळे अडचणीत चांगलीच भर पडली आहे. शेतीकरिता लागणारी खते, बियाणे, औषधी आदी साहित्य पावसाळ्यापूर्वी आणून ठेवावे लागते.

सुसुंद्रा-हेटी गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गावात आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागतो. शेती साहित्य नेण्याची, मुलांना शाळेत जायची अडचण आहे. गावात नागरी सुविधा देण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी असून, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

- राहुल फुले, उपसरपंच

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाwardha-acवर्धा