शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:46 IST

शेतकरी आक्रोश मोर्चातून हाकः 'ओला दुष्काळ जाहीर करा, सातबारा कोरा करा'च्या घोषणा

लोकमत न्युज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व तूर आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली असून, आजही शेतशिवार पाण्याखाली आहे. काही पिके यातून वाचविली; पण त्यावर चारकोल रॉट, येलो मोड़ॉक व खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्याने हातातोंडाशी आलेला घासही या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदाच आज उपासमारीच्या उंबरठ्यावर असल्याने तातडीने सरकारने उपाययोजना करावी. ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चातून केली.

वर्ध्यात क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर व विदर्भअध्यक्ष तथा युवा संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्थानिक बजाज चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून, या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सरकारविरोधात विविध घोषणा आंदोलकांकडून करण्यात आल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली

वर्धा जिल्ह्यात १ जून २०२५ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९८८.७ मिमी पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा २१ टक्के पाऊस झाला असून एकट्या सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा १३७ टक्के पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५४ मंडळांपैकी फक्त ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरीही उर्वरित १९ मंडळांत देखील पिकांचे नुकसान झाले असून, सरसकट दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.

यांची होती उपस्थिती...

या मोर्चात प्रवीण कात्रे, अॅड. मंगेश घुंगरूड, समीर सारजे, सागर दुधाने, लोमहर्ष बाळबुधे, मनोज नागपुरे, संदीप दिधीकर, गौतम पोपटकर, गोपाल चोपडे, स्वप्नील मदणकर, वैभव नगराळे, आशिष भोकरे, तुषार झोड, मंगेश वानखेडे, शेखर धोंगडे, दिनेश गुळघाने, राजू ढगे, इरफान शेख, आसिफ इकबाल, सुनील विपुलवार, गौरव खोपाळ, गजानन ताकसांडे, अंकुश दाभीरे, राहुल पेटकर, सूरज मांडवकर, अनिकेत मानकर, रूपराव खैरकार, दिलीप बालबुथे, सौरभ गोडे यांच्यासह जिल्ह्यातून असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या या आहेत मागण्या

वर्धा जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ घोषित करावा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, जुनीच पीकविमा पद्धत ठेवून त्याचे निकषसुद्धा बदलवू नयेत, जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मजबूत तार कुंपणाची योजना मोफत द्यावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी विशेष पॅकेज व कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणाव्यात, पाणंद रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करावे, शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करून त्यांना मदत करावी, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तत्काळ लागू कराव्यात आदी मागण्या सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.

...तर मोठा संघर्ष उभारला जाईल !

शेतकऱ्यांनी घामाने पिकवलेला घास हिरावला आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, पिकांचे कर्ज आतापर्यंत कोणतीही मदत जाहीर न केल्याने प्रचंड रोष आहे. आपला शेतकरी जगला पाहिजे, या उद्देशाने तातडीने शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने संघर्ष उभा केला जाईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' protest in Wardha due to crop loss, demand immediate aid.

Web Summary : Wardha farmers, facing crop losses from excessive rain and pests, protested demanding immediate government aid, a complete loan waiver, and declaration of a wet drought. They warned of intensified agitation if demands are unmet.
टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनfarmingशेतीfloodपूरRainपाऊसCropपीक