शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जय हनुमान... पुराच्या पाण्यात वाहून आली मूर्ती, प्रवाहातही उभीच दिसल्याने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 09:50 IST

मिळालेल्या माहितीनुसार कुटकी येथील रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानजींची मूर्ती दिसली

वर्धा - पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांचा शहरांसोबतचा संपर्कही तुटल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावाजवळून वाहत असलेल्या वणा नदीच्या पुराच्या पाण्यात हनुमानाची मूर्ती वाहत आली होती. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार कुटकी येथील रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानजींची मूर्ती दिसली. त्यावेळी गावातील नागरिकांना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहातही सरळ उभी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मूर्ती नेमकी कोठून वाहत आली, किंवा परिसरात आजूबाजूच्याठिकाणी कुठे मंदिर होते का, याची अद्याप कुठलीही स्पष्टता झाली नाही. मात्र, मूर्ती वाहत आल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

जिल्ह्यात पूरस्थिती, 9 दरवाजे उघडले

प्रकल्पात येवा वाढल्याने सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे ९ दरवाजे ३० सेंमी सोमवारी सकाळी १० वाजता उघडण्यात आले असून १७२ घन.मी/से विसर्ग बोर नदी पात्रात सोडण्यात आला आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथील सततच्या पाण्यामुळे नाल्याला पूर असून रस्ता बंद करण्यात आला होता. रात्री 2 च्या सुमारास 3 घरा मध्ये पाणी गेले असता सदर व्यक्तींना दुसरीकडे राहण्याची व्यवस्था  केली.  कारंजा तालुक्यात रविवार पासून पडणाऱ्या सतत च्या पावसामुळे सावरडोह नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.  हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने सावंगी हेटी रस्ता बंद झाला आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाRainपाऊसfloodपूरriverनदी