शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न

By आनंद इंगोले | Updated: December 9, 2023 22:39 IST

...त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

वर्धा : अमरावती येथून नागपूर अधिवेशनावर प्रकल्पग्रस्तांनी पायदळ मार्च काढला आहे. हा मार्च महामार्गाने जात असतानाच आज सायंकाळी कारंजा (घाडगे) जवळ प्रकल्पग्रस्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही ताफा नागपुरकडे जातांना दिसला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच सुरक्षा यंत्रणेने प्रकल्पग्रस्तांना बाजुला सारले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागणीकरिता अमरावती ते नागपूर असा पायदळ मार्च काढला आहे. सायंकाळी हा मार्च कारंजा (घाडगे) येथून जात असताना नारा फाट्याजवळ अमरावतीकडून नागपुरकडे जाणारे उपमुख्यमंत्री पवार यांचा ताफा दिसताच प्रकल्पग्रस्तांनी तो अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने काही काळ ताफा थांबला. तेव्हा प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावर बसून ताफा रोखून धरण्यासाठी धावपळ सुरु करताच पोलिसांनी त्यांना तातडीने बाजुला सारुन रस्ता मोकळा करुन दिला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

उपमुख्यमंत्र्यांनी संवाद न साधताच पुढचा रस्ता धरल्याने जोरदार घोषणाबाजी करुन प्रकल्पग्रस्तांनी रोष व्यक्त केला. हे सरकार शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांबाबत संवेदनशील नाहीच, असेही मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनState Governmentराज्य सरकार