शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

तहसीलदारांनी काढली समजूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:31 AM

गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता.

ठळक मुद्देबोरखेडीवासींनी बहिष्कार घेतला मागे : अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.बोरखेडी (गावंडे) हे गाव महसुली दर्जा प्राप्त गाव आहे. झडशी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असून वॉर्ड क्र. ३ मध्ये समाविष्ट आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याकडे वारंवार प्रशासनाने लक्ष वेधत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या तोंडावर बहिष्काराच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विविध प्रलोभने देऊन ग्रामस्थांनी मतदान करावे याकरिता करण्याचा प्रयत्न झाले. मात्र ग्रामस्थ ठाम असल्याने तहसीलदार महेंद्र सोनवणे, गटविकास अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी चव्हाण व बुंदिले यानी गावात भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली.तहसीलदारांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला. यावेळी माजी पोलिस पाटील ईश्वर ढोके, प्रमोद धनविज रितेश ढोके, प्रदीप शंभरकर, विवेक ढोके, माणिक शंभरकर, प्रफुल्ल ढोके, कमलाकर सूर्यवंशी, पूनम धनविज, शोभा ढोके, मंगल ढोके, सुधीर ढोके कानुपात्रा ढोके, धनराज ढोके, अरुण शंभरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्त्याचा विषय पडला मागेजिल्हा परिषद सदस्य विवेक हळदे यानी बोरखेडी येथील बसस्थानक ते गावापर्यंतच्या रस्त्याचा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत मांडला होता. विवेक हळदे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या प्रस्तावावर सभागृहात परत चर्चाच झाली नाही. विषय मागे पडला.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार