शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पाण्यासाठी तीन तास ठिय्या

By admin | Updated: March 8, 2017 01:31 IST

येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढत मंगळवारी ...

गिरड ग्रामपंचायतीत घागर घेवून महिलांची धडक गिरड : येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढत मंगळवारी सकाळी १० वाजतापासून ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले. पाण्याच्या मागणीकरिता संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयापुढे तब्बल तीन तास ठिय्या दिला. यावर ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने सरपंच चंदा कांबळे आणि उपसरपंच विजय तडस यांनी येत्या १५ दिवसांत ही समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन महिलांना दिले. या कालावधीत मार्ग निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला. गिरड येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित असून या नळयोजनेला नागपूर जिल्ह्यातील सिर्सी नाला प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र या जिल्ह्यातील भारनियमन असल्याने त्याचा फटका पाणी पुरवठा योजनेला बसतो. परिणामी ग्रामपंचायतीला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाने यावेळी महिलांना सांगितले.