शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनपाठोपाठ कपाशीही धोक्यात

By admin | Updated: October 10, 2015 02:34 IST

सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

झाडे वाळू लागली : मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमणामुळे अवस्थावर्धा : सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागातील कपाशीची उभी झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेली आशाही मावळली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दिसत असलेल्या या पीक परिस्थितीची माहिती कृषी विभागाला मिळताच सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांसह कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करणे सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमनामुळे पिकांची परिस्थिती दयनीय होत असल्याचे समोर आले आहे. यावर त्यांच्याकडून काही उपयोजनाही सांगण्यात सूचविण्याात आल्या आहेत. वर्धा तालुक्यातील बरबडी, पवनार, धामणगाव, खानापूर येथील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व मोसंबी, सीताफळ आदी पिकांच्या परिस्थितीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, सेलसुरा किटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रदीप दवणे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय खळीकर, सर्व उपविभागीय कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी विकास अधिकारी यांनी पाहणी केली. त्यांना कपाशीची उभे पीक वाळत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कपाशीवर हिरव्या बोंड अळीसह, रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व पिठ्या ढेकुणचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या किडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आाहे. कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांना व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)