शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

सोयाबीनपाठोपाठ कपाशीही धोक्यात

By admin | Updated: October 10, 2015 02:34 IST

सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

झाडे वाळू लागली : मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमणामुळे अवस्थावर्धा : सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागातील कपाशीची उभी झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेली आशाही मावळली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दिसत असलेल्या या पीक परिस्थितीची माहिती कृषी विभागाला मिळताच सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांसह कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करणे सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमनामुळे पिकांची परिस्थिती दयनीय होत असल्याचे समोर आले आहे. यावर त्यांच्याकडून काही उपयोजनाही सांगण्यात सूचविण्याात आल्या आहेत. वर्धा तालुक्यातील बरबडी, पवनार, धामणगाव, खानापूर येथील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व मोसंबी, सीताफळ आदी पिकांच्या परिस्थितीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, सेलसुरा किटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रदीप दवणे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय खळीकर, सर्व उपविभागीय कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी विकास अधिकारी यांनी पाहणी केली. त्यांना कपाशीची उभे पीक वाळत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कपाशीवर हिरव्या बोंड अळीसह, रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व पिठ्या ढेकुणचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या किडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आाहे. कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांना व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)