शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सोयाबीनपाठोपाठ कपाशीही धोक्यात

By admin | Updated: October 10, 2015 02:34 IST

सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

झाडे वाळू लागली : मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमणामुळे अवस्थावर्धा : सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागातील कपाशीची उभी झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेली आशाही मावळली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दिसत असलेल्या या पीक परिस्थितीची माहिती कृषी विभागाला मिळताच सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांसह कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करणे सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमनामुळे पिकांची परिस्थिती दयनीय होत असल्याचे समोर आले आहे. यावर त्यांच्याकडून काही उपयोजनाही सांगण्यात सूचविण्याात आल्या आहेत. वर्धा तालुक्यातील बरबडी, पवनार, धामणगाव, खानापूर येथील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व मोसंबी, सीताफळ आदी पिकांच्या परिस्थितीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, सेलसुरा किटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रदीप दवणे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय खळीकर, सर्व उपविभागीय कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी विकास अधिकारी यांनी पाहणी केली. त्यांना कपाशीची उभे पीक वाळत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कपाशीवर हिरव्या बोंड अळीसह, रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व पिठ्या ढेकुणचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या किडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आाहे. कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांना व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)