शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:46 PM

अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.देवळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागव केली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामाला गती मिळाली. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने सोयाबीन पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली; पण अशातच सध्या सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. खोडकिडीच्या प्रादुर्भावातून सोयाबीन पीक कसे वाचविता येईल यासाठी सध्या शेतकरी प्रयत्नही करीत आहेत. मात्र, पाहिजे तसे यश त्यांना येत नसल्याचे शेतकरी सांगतात. विजयगोपाल भागातील विश्वेश्वर अवसरे, अभिलाश ढांगे, विजय पेटकर, राहूल पेटकर, मयुर अवसरे या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच तो दूर सारण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे.दोन शेतकऱ्यांनी मोडले पीकखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे विजयगोपाल परिसरातील दोन शेतकऱ्यांची उभे सोयाबीन पीक मोडले आहे. वसंत रंधये व सतीश पेठे या शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन पीक खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मुळासकट उपटल्याचे सांगण्यात येते. त्यांना यंदा खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसानच सहन करावे लागल्याने त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरऱ्यांची आहे.उत्पादनात घट येण्याची भीतीखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे उभे पीक करपल्यागत होत असल्याने यंदा उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती