शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

वर्ष लोटूनही मिळेना सौर कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:00 AM

गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले.

ठळक मुद्देयुवा शेतकरी हतबल। वीज महावितरण, सीआरआय एजन्सीची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेकरिता संपूर्ण प्रक्रिया करूनही वर्षभरापासून शेतात कृषिपंप लागला नाही. शेतकरी संबंधित कार्यालयात येरझारा करून आणि विचारपूस करून अक्षरश: थकून गेला. मात्र, यंत्रणेची अनास्था कायम आहे. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न शेतकऱ्याने केला आहे.गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले. यानंतर जयपूरकर यांना भ्रमणध्वनीवर सौरपंप बसविण्याबाबतचा संदेशही प्राप्त झाला. सौर कृषिपंप बसविण्याकरिता शेतकऱ्याने सीआरआय एजन्सीची निवड केली. यावेळी एजन्सीचालक आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून जूनमध्ये सौर कृषिपंप बसवून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सिंचनाची व्यवस्था होणार असल्याने जयपूरकर यांनी शेतात कर्ज काढून अद्रक पिकाची लागवड केली. चार ते पाच लाखांचे उत्पन्न होईल, अशी आशा जयपूरकर यांनी बाळगली. मात्र, सौर कृषिपंप मिळाला नाही. सिंचनाअभावी अद्रकाचे पीक जमिनीतच सडल्याने लागवडीचा खर्च पाण्यात गेला आणि आर्थिक संकट ओढवले. यानंतर जयपूरकर यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, सीआरआय कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौर कृषिपंप लावत असेल तर लावा, असे उद्धट उत्तर दिले; मात्र वर्ष लोटूनही शेतात सौर कृषिपंप लागला नाही. आठ दिवसांत कृषिपंप न लागल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा जयपूरकर यांनी दिला आहे.वीज वितरणचा अनागोंदी कारभारवीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या संपूर्ण व्यवहाराविषयी हा विभाग अनभिज्ञ आहे. केवळ अपडेट घेत आहोत, असे म्हणून अधिकारी वेळ मारून नेत आहेत. जिल्हाधिकाºयांनी या प्रश्नात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी प्रणय जयपूरकर यांनी केली आहे.योजना फसवी असल्याची ओरडसौर कृषिपंपाकरिता जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रक्रिया करीत एजन्सीची निवड केली. मात्र, अद्याप कित्येक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. नेमलेल्या एजन्सीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.बळजबरीने लादली जातेय योजनाशेतकरी वीज वितरणकडे वीजपुरवठ्याची मागणी करीत असताना वीज वितरणचा देण्यास नकार असून सौर कृषिपंप घेण्यास बाध्य केले जात असून बळजबरीने ही योजना शेतकऱ्यांवर थोपविली जात आहे. जिल्हा प्रशासनाचे यावर मात्र, नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक संबंधित यंत्रणांकडून सुरूच आहे.

टॅग्स :agricultureशेती