शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

समाजोपयोगी वृक्ष लागवड हितकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:12 AM

अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे.

ठळक मुद्देमारूती चितमपल्ली : जनहित मंचचा पाचवा वर्धापन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे. वृक्ष लागवड करीत असताना वृक्ष लागवड समाजासाठी हितकारक ठरेल, असे मत मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक व वन्यजीव अभ्यासक, लेखक मारोती चितमपल्ली यांनी व्यक्त केले.जनहित मंचचा पाचवा वर्धापन दिन सोहळा ‘मुक्तांगण’ आदिवासी वसतिगृहासमोर आयटीआय टेकडी उमरी (मेघे) येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, सचिव डॉ. राजेश आसमवार, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर आदी उपस्थित होते.मारूती चितमपल्ली पूढे म्हणाले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. आज चिमण्या, कावळे व घारी हे पक्षी नाहीसे झाले आहेत. सापांना ठार मारले जाते. सापांना मारू नका, निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी कढीपत्ता व शेवग्याच्या शेंगांची झाडे लावा. मधमाशा पालन करा. नदी, नाल्यांच्या बाजूला उंबराची झाडे लावा. ती झाडे पाण्याची पातळी वर आणते. शेतात बांध घातले पाहिजे. चारोळीची झाडे लावा. ते एक उत्पन्नाचे साधन होईल. ताड, चिंच, खजुर, सिंदीचे झाडे लावल्याने समाजाला त्याचा उपयोग होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीची चिकाटी स्तुत्य आहे.जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, जनहित मंचने निर्माण केलेला हा परिसर खºया अर्थाने वर्धेकरांसाठी मुक्त आंगण म्हणून उदयास येत आहे. मुक्तांगणात बहरलेले फुल पाहताना तुमच्या परिश्रमाने रंग आणला. कोणतेही कार्य करताना स्वत:चे समर्पण असेल तर त्याचे महत्त्व मोठे असते. मुक्तांगण हे एक मॉडेल ठरू शकते. शिक्षण प्रणालीमध्ये थोडा बदल करून त्या शिक्षणासोबत वृक्षारोपण, स्वच्छता, वृद्धांचा सन्मान असे सामाजिक मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांत संस्कारयुक्त शिक्षणाचा समावेश गरजेचा आहे. सामाजिक परिवर्तनास्तव संस्कारयुक्त बालक घडविण्याचा प्रयत्न विविध स्वयंसेवी संस्थांनी करावा. हे शास्वत विकासासाठी उपयोगी, प्रेरणादायी ठरेल. सर्वांनी सकारात्मक कार्य केल्यास बदल निश्चित घडून येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बावसे यांनी केले तर मुक्तांगणची वाटचाल डॉ. राजेश आसमवार यांनी विषद केली. संचालन सुभाष पाटणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. जयंत मकरंदे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मुरलीधर बेलखोडे, डॉ. तारक काटे, डॉ. अरुण पावडे, डॉ. सचिन पावडे, भोयर, कौशल मिश्रा, अविनाश सातव, सुनील सावध, प्रा. शेख हाशम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जनहित मंचचे सर्व सदस्य, पदाधिकारी व नागरिकांनी सहकार्य केले.जनहित मंचच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील ‘मुक्तांगण’ला सहकार्य करणाºया मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात बजाज फाऊंडेशनचे महेंद्र फाटे, आदिवासी वसतिगृहाचे किशोर रहाटे, अरविंद पवार व अमेरिका स्थित डॉ. सुरूची गालकर यांचा मानपत्र देत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.