शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वर्धा जिल्ह्यात बहिणीपाठोपाठ भावाचेही निधन; परिवारात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 1:28 PM

Wardha News त्या दोघांमधील बहीणभावाचे नाते असे होते की, एकाच मांडवात त्यांचे लग्न झाले आणि अखेर बहिणीपाठोपाठ भावानेही प्राण सोडले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना घडली सेवाग्राम येथे.

ठळक मुद्देएकाच मांडवात झाले होते लग्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: त्या दोघांमधील बहीणभावाचे नाते असे होते की, एकाच मांडवात त्यांचे लग्न झाले आणि अखेर बहिणीपाठोपाठ भावानेही प्राण सोडले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना घडली सेवाग्राम येथे.म्हसाळा येथील शकुंतला क्षीरसागर (६०) व घनश्याम भोसकर (६४) यांचे मंगळवारी निधन झाले. बहिणीचे निधन झाल्याची वार्ता समजताच घनश्याम यांचेही प्राणोत्क्रमण झाले.

नागपुरच्या शकुंतला भोसेकर यांचा विवाह विनय क्षीरसागर यांच्याशी आणि घनशाम भोसकर यांचा पण विवाह १९८९ मध्ये एकाच मांडवात झाला.आपापले पारिवारिक जीवन सुखासमाधानाने जगत होते. शकुंतला क्षीरसागर या दोन वर्षाअगोदर हमदापूर येथील यशवंत विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या. सर्व काही व्यवस्थित असतानाच आजार बळावला आणि स्थानिक कस्तुरबा रूग्णालयात पंधरा दिवस उपचार घेत असताना मंगळवारला निधन झाले. तर दुसरीकडे घनशाम भोसकरसुध्दा आजारी असल्याने नागपूरच्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत होते.

शकुंतला आपल्या या बहिणीचे निधन झाल्याची माहिती मिळताच ह्रदय विकाराच्या धक्क्याने घनशाम यांचेही निधन झाले.एकाच मांडवात आणि एकाच दिवशी बहिण भावांचे लग्न झाले आणि एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाला. दोन्ही परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शकुंतला क्षीरसागर यांना स्थानिक स्मशानभूमीत मंगळवारी मुलगा गौरवने मुखाग्नी दिला. तर खांदा पती आणि शीतल व अदिती या दोन मुलींनी दिला.घनशाम यांच्यावर बुधवारी अंतसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, विवाहित दोन मुली व एक अविवाहित मुलगी आणि आप्तस्वकिय आहे. दोघांच्याही परिवारावर दु:खाचा डोंगर मात्र कोसळला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू