शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

चार वर्षांत सापडले मेंदूज्वराचे सात रुग्ण; मृत्यू रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 5:00 AM

मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनसेफेलिटिस हा सामान्य आजार समजला जात असून, तो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. साधारणत: तीन ते सहा वयोगटातील चिमुकले प्रभावित होतात.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा नागरिकांनी औषधोपचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसांत कीटकजन्य आजार डोके वर काढतात. त्यात जपानी एनसेफेलिटिस (मेंदूज्वर)चाही समावेश आहे. या आजाराची साधी-साधी लक्षणे असून, मागील चार वर्षांत जिल्ह्यात जपानी एनसेफेलिटिसची तब्बल सात रुग्ण सापडल्याची नोंद आरोग्य यंत्रणेतील हिवताप विभागाने घेतली आहे.मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनसेफेलिटिस हा सामान्य आजार समजला जात असून, तो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. साधारणत: तीन ते सहा वयोगटातील चिमुकले प्रभावित होतात. फ्लेविवियरस जीनच्या व्हायरसमुळे जपानी एनसेफेलिटिस होत असला तरी, तो सामान्यत: डास चावल्यामुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आपल्या घराच्या परिसरात कुठे पाणी साचून डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करणे गरजचेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह जपानी एनसेफेलिटिस नागरिकांच्या अडचणीत भर टाकू शकते. त्यामुळे कोराेना विषयक खबरदारी घेतानाच यंदाच्या पावसाळ्यात या आजारांना रोखण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना विशेष दक्षता बाळगावी लागणार आहे.

प्राथमिक लक्षणेबहुतेक रुग्णांत कोणतेच लक्षण दिसत नाहीत. असे असले तरी ताप, डोकेदुखी, मरगळलेपणा, पातळ शौच, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, स्नायूंमध्ये असामान्य कडकडपणा, हालचालींमध्ये अपंगत्व, झटके येणे ही जपानी एनसेफेलिटिसची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा नागरिकांनी औषधोपचारजपानी एनसेफेलिटिसचे लक्षणे आढळल्यास बाधित व्यक्तीने कुठलीही हयगय न करता नजीकच्या रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे. असे केल्यास जपानी एनसेफेलिटिस मृत्यू टाळण्यास मदत होते, असे सांगण्यात आले.

पावसाळ्याच्या दिवसांत कीटकजन्य आजार डोकेवर काढतात. त्यामुळे सध्याच्या कोविड संकटात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी. शिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. कोरडा दिवस हा डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लावण्यासाठीचा प्रभावी उपाय आहे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य