शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जल, जमीन, जंगल बचाओ मोहीम लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:22 IST

आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : तीन दिवसीय ११४ किमी जनजागृती सायकल यात्रा

आॅनलाईन लोकमतवर्धा : आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे. जल, जमीन, जंगल बचाओ ही मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी स्थानिक एन.सी.सी. परेड मैदानात आयोजित विशेष कार्यक्रमात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. सी. सी. चे समादेशक अधिकारी कर्नल पद्यभान जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, इमरान राही, प्रा. किशोर वानखेडे, संजय इंगळे तिगावकर, प्रा. संतोष मोहदरे, प्रा. जगदीश यावले, प्रकाश डाखोळे, संतोष तुरक, प्रा. मोहन गुजरकर यांची उपस्थिती होती. यावेळी तीन दिवसीय ११४ कि.मी.च्या जनजागृतीपर सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. या यात्रेचे देवळी शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सालोड येथे प्रहार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायकल स्वारांचे स्वागत करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सुरगाव येथे गुरूदेव सेवा मंडळातर्फे प्रविण देशमुख महाराज यांच्या प्रमुख उपस्थित जनजागृतीपर सायकल यात्रेतील तरुणांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधनात्मक नाटीका सादर करण्यात आली.५४ कि.मी.चा प्रवास करून ही यात्राला बोर वाघ्र प्रकल्प येथे पोहचली. तेथे वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर तळवेकर यांनी तरुणांचे स्वागत केले. त्यानंतर परतीचा प्रवास करताना रिधोरा धरण परिसरात ही जनजागृतीपर सायकल यात्रा पोहोचली असता तेथेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर जामणी येथे दिनकर विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रबोधनात्मक उपक्रम सादर करण्यात आला. २३ मार्चला जागतिक वायूदिन व शहीद दिवस पर्वावर सायकल अभियानाचे देवळी येथे समारोप झाला.सदर अभियानाचे नेतृत्त्व कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. किशोर वानखेडे यांनी केले. यात स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, निहाल झाडे, लोभास उघडे, स्वप्नील मडावी, योगेश आदमने, तेजस झाडे, राजेश सुरजुसे, श्रीकांत गणवीर, संकेत काळे, अनिकेत डुकरे, स्वप्नील कडू, विक्की थुल, निलेश नेहारे, प्रतिकेश चितळकर, प्रा. रविंद्र गुजरकर, संकेत हिवंज, रितिक झाडे, विवेक दोंदल, राहुल कामडी, प्रज्वल जांभुळकर, मयुर चंदनखेडे, तुषार झाडे, रितिक बलवीर, गणेश मोरे, आकाश ऐकोणकर, शिवम भुते, रितीक कळमकर, रूपाली मुगंले, प्रगती एकोणकर, प्रणाली साबळे, पुनम बैस, पूजा घोडे, प्रतिक्षा ऐकोणकर आदी सहभागी झाले होते. या सायकल यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना जल, जमीन, जंगल याचे महत्त्व पटवून देण्यात आले.