शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जल, जमीन, जंगल बचाओ मोहीम लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:22 IST

आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : तीन दिवसीय ११४ किमी जनजागृती सायकल यात्रा

आॅनलाईन लोकमतवर्धा : आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे. जल, जमीन, जंगल बचाओ ही मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी स्थानिक एन.सी.सी. परेड मैदानात आयोजित विशेष कार्यक्रमात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. सी. सी. चे समादेशक अधिकारी कर्नल पद्यभान जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, इमरान राही, प्रा. किशोर वानखेडे, संजय इंगळे तिगावकर, प्रा. संतोष मोहदरे, प्रा. जगदीश यावले, प्रकाश डाखोळे, संतोष तुरक, प्रा. मोहन गुजरकर यांची उपस्थिती होती. यावेळी तीन दिवसीय ११४ कि.मी.च्या जनजागृतीपर सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. या यात्रेचे देवळी शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सालोड येथे प्रहार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायकल स्वारांचे स्वागत करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सुरगाव येथे गुरूदेव सेवा मंडळातर्फे प्रविण देशमुख महाराज यांच्या प्रमुख उपस्थित जनजागृतीपर सायकल यात्रेतील तरुणांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधनात्मक नाटीका सादर करण्यात आली.५४ कि.मी.चा प्रवास करून ही यात्राला बोर वाघ्र प्रकल्प येथे पोहचली. तेथे वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर तळवेकर यांनी तरुणांचे स्वागत केले. त्यानंतर परतीचा प्रवास करताना रिधोरा धरण परिसरात ही जनजागृतीपर सायकल यात्रा पोहोचली असता तेथेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर जामणी येथे दिनकर विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रबोधनात्मक उपक्रम सादर करण्यात आला. २३ मार्चला जागतिक वायूदिन व शहीद दिवस पर्वावर सायकल अभियानाचे देवळी येथे समारोप झाला.सदर अभियानाचे नेतृत्त्व कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. किशोर वानखेडे यांनी केले. यात स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, निहाल झाडे, लोभास उघडे, स्वप्नील मडावी, योगेश आदमने, तेजस झाडे, राजेश सुरजुसे, श्रीकांत गणवीर, संकेत काळे, अनिकेत डुकरे, स्वप्नील कडू, विक्की थुल, निलेश नेहारे, प्रतिकेश चितळकर, प्रा. रविंद्र गुजरकर, संकेत हिवंज, रितिक झाडे, विवेक दोंदल, राहुल कामडी, प्रज्वल जांभुळकर, मयुर चंदनखेडे, तुषार झाडे, रितिक बलवीर, गणेश मोरे, आकाश ऐकोणकर, शिवम भुते, रितीक कळमकर, रूपाली मुगंले, प्रगती एकोणकर, प्रणाली साबळे, पुनम बैस, पूजा घोडे, प्रतिक्षा ऐकोणकर आदी सहभागी झाले होते. या सायकल यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना जल, जमीन, जंगल याचे महत्त्व पटवून देण्यात आले.