शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

संत लहानुजी महाराज संस्थानने बायोगॅस प्रकल्पातून केली वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

सामाजिक विकास साधण्यासाठी आर्वी तालुक्यातील टाकरखेडचे संत लहानुजी महाराज देवस्थान विविध उपक्रम राबवित आहे. या देवस्थानच्या शेतीमध्ये बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासोबतच गौरक्षण, शेतकरी मार्गदर्शन आणि आरोग्यसेवेवर कार्यरत असल्याने हे देवस्थान अनेकांसाठी मॉडेल ठरले आहे.

ठळक मुद्देटाकरखेडचे देवस्थान ठरले मॉडेल : गौरक्षण, आरोग्यसेवा, शेतकरी मार्गदर्शनावर भर

पुरुषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी (वर्धा) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारावर आधारित मानवाचा आध्यात्मिक व सामाजिक विकास साधण्यासाठी आर्वी तालुक्यातील टाकरखेडचे संत लहानुजी महाराज देवस्थान विविध उपक्रम राबवित आहे. या देवस्थानच्या शेतीमध्ये बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासोबतच गौरक्षण, शेतकरी मार्गदर्शन आणि आरोग्यसेवेवर कार्यरत असल्याने हे देवस्थान अनेकांसाठी मॉडेल ठरले आहे.संत लहानुजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे व त्यांच्या संचालक मंडळाने राष्ट्रसंतांच्या विचारावरच प्रगतीचा ध्यास घेतला आहे. या देवस्थानामध्ये सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, नियमित अन्नदान, निराश्रितांना आश्रय, गौरक्षण, आरोग्यसेवा, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, पर्यावरण संरक्षण तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प आदी उपक्रम राबविले जात आहे. या संस्थानच्या गौरक्षण केंद्रामध्ये सध्या ३५० गाईंचे संगोपन केले जात असून अजून १०० गाईंची व्यवस्था आहे. संस्थानच्या मालकीची ४० एकर शेती असून सेंद्रिय पद्धतीने केली जाते. गांडूळ खतनिर्मिती करून परिसरातील शेतकऱ्यांना नाममात्र दरात पुरविले जाते. याच खताचा वापर संस्थेच्याही शेतात होत असल्याने परिसरात सेंद्रिय शेतीची चळवळ उभी राहिली आहे. महाऊर्जाच्या सहकार्याने शेतात बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे गॅससह विजेचीही सुविधा झाली आहे. परिणामी, वृक्षतोडीला आळा बसला असून याच प्रकल्पाच्या इंधनावर सध्या संस्थामध्ये चालत असलेल्या अन्नदानाचा स्वयंपाक केला जातो. यावर्षी संस्थेच्यावतीने ३ एकरामध्ये ज्वारीची लागवड केली होती. त्यातून जवळपास ४७ क्विंटलचे उत्पादन झाले. दरवर्षी विविध प्रकल्प आणि शेतीतून संस्थानला उत्पन्न मिळते. त्यांच्या या उपक्रमाला तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह स्वामिनाथन व महासंगणकाचे जनक संशोधक विजय भटकर यांनीही भेट दिली आहे.वृद्धांसाठी आश्रय योजनाजे निराधार आहे, त्यांना कुणाचाही आधार नाही. अशा वृद्धांसाठी संस्थानने ‘आश्रय’ ही योजना राबविली आहे. त्यांची राहण्याची, जेवण्याची व औषधीची सर्व व्यवस्था संस्थानने केली आहे. सध्या या संस्थेत ३५ निराधार व्यक्ती आश्रयाला आहेत. या संस्थेला इंडियन असोसिएशन आर्वीच्यावतीने विनामूल्य आरोग्य सेवा पुरविली जाते. यासोबतच नियमित आरोग्य तपासणी शिबिर राबवून आरोग्य निदान व उपचार केले जाते. गेल्यावर्षी ५ हजार ८५ रुग्णांना सेवा देण्यात आली. याकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन चेन्नई व महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय सावंगी (मेघे) आदींचे सहकार्य मिळत आहे.अन्नदानाची योजना ठरली अभिनवसंस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांचे वडील भगवंत पावडे हे पूर्वी अध्यक्ष होते. त्यांनी या देवस्थानात येणाºया भाविकांसाठी दररोज अन्नदान योजना सुरू केली होती. तीच योजना आता ३२ वर्षांनंतरही बाळासाहेबांनी चालू ठेवली असून अभिनव योजना ठरली आहे. याकरिता १ हजार ८०० भाविकांनी ३ कोटी ३३ लाखांचा निधी दिली आहे. हा निधी संस्थानने विविध बँकांमध्ये जमा ठेवला असून त्यातून मिळणाºया व्याजातूनच दररोज अडीचशे ते तीनशे लोकांना अन्नदान केले जाते. याव्यतिरिक्त दरवर्षी महाराजांची जयंती व पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. तेव्हा जवळपास ८० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून मानवाचा आध्यात्मिक व सामाजिक विकास साधण्यावर देवस्थानचा भर आहे. देवस्थानासोबतच परिसरातील शेतकरी व नागरिकांचा विकास महत्त्वाचा असल्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. जुने उपक्रम कायम ठेवून त्याला नव्याची जोड दिली जात आहे. भाविकांसह गावकऱ्यांकडूनही मोठे सहकार्य मिळत असल्याने महाराजांच्या आशीर्वादाने कार्यात यशही प्राप्त होत आहे.- बाळासाहेब पावडे, अध्यक्ष, संत लहानुजी महाराज संंस्थान, टाकरखेड.

टॅग्स :electricityवीज