शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जिल्ह्यातील वाळूतस्करांना मिळतेय शासन-प्रशासनाचे अभय; खासदारांनीच केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:28 IST

जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र : २५ वाळू घाट लिलावास पात्र, उर्वरित घाटातून वाळू झाली गायब

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात ९० ते ९५ वाळूघाट असून यातील २५ वाळूघाट हे एक हेक्टर क्षेत्राच्या आतील असून शासन निर्णयानुसार ते लिलावाकरिता पात्र ठरतात. इतर घाट १ हेक्टरच्या आतील असल्याने त्यांचा लिलाव केला जात नाही. त्यामुळे हे सर्व घाट वाळूचोरट्यांसाठी कुरण ठरत असून, यातून राजरोसपणे वाळू उपसा होत आहे. याला शासन प्रशासनाचेच अभय असल्याचा आरोप खुद्द खासदार अमर काळे यांनी केला असून, त्या संदर्भात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना पत्रही दिले आहे. 

जिल्ह्यातील जे २५ वाळूघाट लिलावाला पात्र आहेत, त्यांचा शासनाच्या संभ्रमावस्थेतील धोरणामुळे लिलाव झालेले नाही, या प्रकाराने वाळूचोरांसाठी मोकळीक मिळाली आहे. वाळू आणताना केवळ वाळूचोराचा ट्रक पकडायचा आणि पुढील कारवाई काहीच करायची नाही, असे धोरण प्रशासनाने अवलंबलेले आहे. घाटातून केवळ पोलिस पकडतात, तेवढीच दोन-तीन ट्रक वाळू आणली जाते काय, हाही संशोधनाचा विषय असल्याचे खासदारांनी म्हटले आहे. 

जिल्ह्यामध्ये लिलावच झाला नाही तर घाटातील वाळू गेली तरी कुठे ?सध्या जिल्ह्यात एकाही वाळूघाटाचा लिलाव झाला नसताना घाटातील वाळू गेली कुठे, जिल्ह्यातील वाळूमाफिया प्रशासनाला दिसत नाहीत काय ? प्रशासन म्हणून आपण याबाबत ठोस उपाययोजना करून तत्काळ कारवाई करा व शासनाचे हित जोपासा, अशी अपेक्षा खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली आहे.

घाटांचे मोजमाप करा, सत्यता पुढे येणारघाटात सुरुवातीला उपलब्ध वाळूसाठा व आजच्या स्थितीत उपलब्ध वाळू, यांचा हिशेब शासकीय अधिकाऱ्यांनी काढावा; म्हणजे वाळूतस्कर किती प्रमाणात कार्यरत आहेत, हे माहीत पडेल व त्यांचे सर्व कारनामे उघड होतील; पण, हे करण्याची शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता असणे तेवढीच गरजेची आहे, असेही खासदार काळे म्हणाले.

शासकीय कामावर वाळू येते तरी कुठून ?वाळूघाटांचा लिलाव झालेला नाही आणि वाळूची चोरीही होत नाही. असे असेल तर शासनासह खासगी, मोठमोठी बांधकामे, सिमेंट रस्त्यांची शासकीय कामे (स्थानिक), इतर काँक्रीटची बांधकामे ही कोणत्या वाळूतून होत आहेत, असा प्रश्नही त्यांनी पत्रातून विचारला. शासनाने घरकुलाकरिता वाळू पुरविण्याचे धोरण जाहीर केले आहे; पण उपलब्ध वाळू व मागणी यांचा ताळमेळच लेला नाही.

टॅग्स :wardha-acवर्धाsandवाळूmafiaमाफियाAmar Kaleअमर काळे