शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

तीन टप्प्यात धामची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:13 PM

वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजलस्त्रोताचे बळकटीकरण : नाम फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे. हा उपक्रम नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ही मोहीम उद्या शनिवारपासून सुरू होणार असून त्याला ‘धाम नदी स्वच्छता अभियान’ असे नाव देण्यात आले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरिश इथापे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जि.प.सदस्य राजश्री राठी यांची उपस्थिती होती.शिवाय याच नदीतून वर्धा शहराला आणि आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. या नदीपात्रात असलेल्या जलपर्णीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शिवाय नदीचे पात्र अरुंद झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नदीपात्रात पाणी राहत नसल्याचे समोर आले आहे. ही नदी जिल्हयातील काचनूर ते आंजी(मोठी) त.वर्धा ते येळाकेळी,त.सेलु या भागातून धाम नदी वाहते.या नदीमधुन वर्धा व परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नदीपात्रात असलेल्या अस्वच्छतेमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत कमकुवत झाले आहेत. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आताच दिसत आहे. ही भीषण समस्या, या भागातील लोकांची व लोकप्रतिनिधींची मागणी पाहता जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाऊंडेशनच्यावतीने या नदीच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. ही स्वच्छता मोहीम उद्यापासून प्रारंभ होणार आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मेश्राम, कार्यकारी अभियंता नरेश शेनवार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग काळे, आंजी (मोठी) येथील सरपंच जगदीश संचारिया, सामाजिक कार्यकर्ते अशोक कलोडे, सुनील गफाट प्रामुख्याने उपस्थित होते.नाम फाऊंडेशन आणि लोकसहभागातून मोहीमधाम नदीपात्राच्या स्वच्छतेची मोहीम शासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून नाम फाऊंडेशन राबविणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पहिला आर्वी तालुक्यातील काचनुर, वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) येथे दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे राबविण्यात आला.

टॅग्स :riverनदी