शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

‘सिग्नल्स’वर केलेला 50 लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. 

ठळक मुद्देवाहतूककोंडी झाली नित्याचीच : नियोजनशून्यतेचा शहरवासीयांना बसतोय फटका, कोण देणार लक्ष?

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी तसेच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या चौकांत पाच ते सहा वर्षांपूर्वी सिग्नल्स उभारण्यात आले. अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च या उपक्रमावर झाला. मात्र, हा उपक्रम फोल ठरला. प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक शशिकांत भांडारे यांच्या देखरेखीत शहरातील बजाज चौक, आर्वीनाका, शिवाजी चौक, आरती चौक, धुनिवाले चौक आदी मुख्य चौकात सिग्नल उभारण्याचे काम सुरु झाले. सिग्नल लागलेही पण, मात्र, अवघ्या काही दिवसांत ते बंदही झाले. आज सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असूनही शहरातील सिग्नल मात्र, सुरु झालेले नाही. यामध्ये बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे उभारलेले सिग्नल पुन्हा काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा बसविण्यात आले, बांधकाम विभाग आणि पालिकेत समन्वयाचा अभाव आणि नियोजनशुन्यतेमुळे वर्धेकार आजही सिग्नल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सिग्नलवर झालेला लाखोंचा खर्च हा वाया गेल्याने ही भरपाई कोण करणार, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाकडून सिग्नल उभारणीवर झालेला खर्च किती लागला. हे तपासण्याची गरज आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तत्काळ याबाबतची चैाकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

जबाबदारी नेमकी कुणाची?सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करुन शहरात उभारण्यात आलेल्या सिग्नलची अवस्था आज बिकट झाली आहे. रस्ते निर्माण झाले पण, सिग्नलचे दिवे अजूनही बंदच आहे. झालेला खर्च व्यर्थ गेला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अधांतरीच राहिले. बांधकाम विभाग नगरपालिका आणि नगरपालिका बांधकाम विभागाला दोषी ठरवत जरी असले तरी नेमकी ही जबाबदारी कुणाची होती, हा उपक्रम बंद पडल्याने कितीचे लाखांचे काम झाले, कितीचे नाही, शिल्लक असलेला निधी कुणाकडे गेला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून याची चौकशी करणे गरजेचे आहे.

वाहतूक बुथ ठरतेय शोभेचेबजाज चौक आणि आर्वी नाका चौकात सिग्नल उभारणी केल्यावर वाहतूक पोलिसांसाठी बुथ तयार केले होते. मात्र, सिग्नल सुरुच न झाल्याने आजही ते वाहतूक बुथ आहे त्याच ठिकाणी पडून आहे. मोकाट श्वान आणि जनावरांसाठी ते बुथ सध्या निवासस्थान बनले आहे. चौकाच्या मध्यभागात उभारण्यात आलेले बुथ सध्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

काही सिग्नल चोरी, तर काही तुटलेआर्वीनाका चौकात आणि आरती चौकात लावलेले सिग्नल वादळी वाऱ्याने जमिनीवर पडले होते. अनेक दिवस सिग्नल रस्त्यावरच पडून होते. काही  लोखंडी दिवे चोरट्यांनी चोरुन नेले. तर जे दिवे जमिनीवर पडले होते त्यांना उचलुन नगरपालिकेच्या इमारत आवारात धुळखात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक