शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘सिग्नल्स’वर केलेला 50 लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. 

ठळक मुद्देवाहतूककोंडी झाली नित्याचीच : नियोजनशून्यतेचा शहरवासीयांना बसतोय फटका, कोण देणार लक्ष?

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी तसेच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या चौकांत पाच ते सहा वर्षांपूर्वी सिग्नल्स उभारण्यात आले. अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च या उपक्रमावर झाला. मात्र, हा उपक्रम फोल ठरला. प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक शशिकांत भांडारे यांच्या देखरेखीत शहरातील बजाज चौक, आर्वीनाका, शिवाजी चौक, आरती चौक, धुनिवाले चौक आदी मुख्य चौकात सिग्नल उभारण्याचे काम सुरु झाले. सिग्नल लागलेही पण, मात्र, अवघ्या काही दिवसांत ते बंदही झाले. आज सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असूनही शहरातील सिग्नल मात्र, सुरु झालेले नाही. यामध्ये बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे उभारलेले सिग्नल पुन्हा काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा बसविण्यात आले, बांधकाम विभाग आणि पालिकेत समन्वयाचा अभाव आणि नियोजनशुन्यतेमुळे वर्धेकार आजही सिग्नल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सिग्नलवर झालेला लाखोंचा खर्च हा वाया गेल्याने ही भरपाई कोण करणार, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाकडून सिग्नल उभारणीवर झालेला खर्च किती लागला. हे तपासण्याची गरज आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तत्काळ याबाबतची चैाकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

जबाबदारी नेमकी कुणाची?सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करुन शहरात उभारण्यात आलेल्या सिग्नलची अवस्था आज बिकट झाली आहे. रस्ते निर्माण झाले पण, सिग्नलचे दिवे अजूनही बंदच आहे. झालेला खर्च व्यर्थ गेला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अधांतरीच राहिले. बांधकाम विभाग नगरपालिका आणि नगरपालिका बांधकाम विभागाला दोषी ठरवत जरी असले तरी नेमकी ही जबाबदारी कुणाची होती, हा उपक्रम बंद पडल्याने कितीचे लाखांचे काम झाले, कितीचे नाही, शिल्लक असलेला निधी कुणाकडे गेला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून याची चौकशी करणे गरजेचे आहे.

वाहतूक बुथ ठरतेय शोभेचेबजाज चौक आणि आर्वी नाका चौकात सिग्नल उभारणी केल्यावर वाहतूक पोलिसांसाठी बुथ तयार केले होते. मात्र, सिग्नल सुरुच न झाल्याने आजही ते वाहतूक बुथ आहे त्याच ठिकाणी पडून आहे. मोकाट श्वान आणि जनावरांसाठी ते बुथ सध्या निवासस्थान बनले आहे. चौकाच्या मध्यभागात उभारण्यात आलेले बुथ सध्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

काही सिग्नल चोरी, तर काही तुटलेआर्वीनाका चौकात आणि आरती चौकात लावलेले सिग्नल वादळी वाऱ्याने जमिनीवर पडले होते. अनेक दिवस सिग्नल रस्त्यावरच पडून होते. काही  लोखंडी दिवे चोरट्यांनी चोरुन नेले. तर जे दिवे जमिनीवर पडले होते त्यांना उचलुन नगरपालिकेच्या इमारत आवारात धुळखात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक