शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘सिग्नल्स’वर केलेला 50 लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. 

ठळक मुद्देवाहतूककोंडी झाली नित्याचीच : नियोजनशून्यतेचा शहरवासीयांना बसतोय फटका, कोण देणार लक्ष?

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी तसेच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या चौकांत पाच ते सहा वर्षांपूर्वी सिग्नल्स उभारण्यात आले. अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च या उपक्रमावर झाला. मात्र, हा उपक्रम फोल ठरला. प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक शशिकांत भांडारे यांच्या देखरेखीत शहरातील बजाज चौक, आर्वीनाका, शिवाजी चौक, आरती चौक, धुनिवाले चौक आदी मुख्य चौकात सिग्नल उभारण्याचे काम सुरु झाले. सिग्नल लागलेही पण, मात्र, अवघ्या काही दिवसांत ते बंदही झाले. आज सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असूनही शहरातील सिग्नल मात्र, सुरु झालेले नाही. यामध्ये बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे उभारलेले सिग्नल पुन्हा काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा बसविण्यात आले, बांधकाम विभाग आणि पालिकेत समन्वयाचा अभाव आणि नियोजनशुन्यतेमुळे वर्धेकार आजही सिग्नल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सिग्नलवर झालेला लाखोंचा खर्च हा वाया गेल्याने ही भरपाई कोण करणार, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाकडून सिग्नल उभारणीवर झालेला खर्च किती लागला. हे तपासण्याची गरज आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तत्काळ याबाबतची चैाकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

जबाबदारी नेमकी कुणाची?सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करुन शहरात उभारण्यात आलेल्या सिग्नलची अवस्था आज बिकट झाली आहे. रस्ते निर्माण झाले पण, सिग्नलचे दिवे अजूनही बंदच आहे. झालेला खर्च व्यर्थ गेला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अधांतरीच राहिले. बांधकाम विभाग नगरपालिका आणि नगरपालिका बांधकाम विभागाला दोषी ठरवत जरी असले तरी नेमकी ही जबाबदारी कुणाची होती, हा उपक्रम बंद पडल्याने कितीचे लाखांचे काम झाले, कितीचे नाही, शिल्लक असलेला निधी कुणाकडे गेला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून याची चौकशी करणे गरजेचे आहे.

वाहतूक बुथ ठरतेय शोभेचेबजाज चौक आणि आर्वी नाका चौकात सिग्नल उभारणी केल्यावर वाहतूक पोलिसांसाठी बुथ तयार केले होते. मात्र, सिग्नल सुरुच न झाल्याने आजही ते वाहतूक बुथ आहे त्याच ठिकाणी पडून आहे. मोकाट श्वान आणि जनावरांसाठी ते बुथ सध्या निवासस्थान बनले आहे. चौकाच्या मध्यभागात उभारण्यात आलेले बुथ सध्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

काही सिग्नल चोरी, तर काही तुटलेआर्वीनाका चौकात आणि आरती चौकात लावलेले सिग्नल वादळी वाऱ्याने जमिनीवर पडले होते. अनेक दिवस सिग्नल रस्त्यावरच पडून होते. काही  लोखंडी दिवे चोरट्यांनी चोरुन नेले. तर जे दिवे जमिनीवर पडले होते त्यांना उचलुन नगरपालिकेच्या इमारत आवारात धुळखात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक