शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

वांगी शेतकऱ्यांकडून 13 रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात 30 रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

 दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : हल्ली शेतकऱ्यांच्या  वांगी, भेंडी, चवळीसह इतरही भाजीपाल्यांचे भाव चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचा भाजीपाला  कवडीमोल भावाने खरेदी केला जातो, शेतकऱ्यांना  मिळालेल्या भावाच्या दुप्पट भावाने  ग्राहकांना विकला जातो, त्यामुळे  याचा कवडीचाही फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत नाही. भाजीपाल्याच्या  ढासळलेल्या भावबाजीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी   वांगी, भेंडी, चवळी या भाजीपाला वर्गीय उभ्या पिकात जनावरे सोडलीत, तर काहींनी पिकाची निगा राखणे सोडले, पावसाळ्याचे अडीच महिने संपले असताना आपल्या जिल्ह्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, असे असताना सुद्धा जिल्ह्यातील उत्पादित चवळी शेंगा, भेंडी, पालक, वांगी, काकडी, ढेमस आदी  भाजीपाल्याचे दर कोसळले यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीच्या कैचीत सापडला आहे.         दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या दरवाढीने मात्र, ग्राहकांच्याही खिशाला आर्थिक झळ पोहचत असून गृहिणींचेही बजेट कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

 यंदा तर भाजीपाला उत्पादनाचे वाटोळे झाले आहे. यावर्षी एक एकर शेतात वांग्याची लागवड केली, ऐन वांगी निघण्याच्या भरातच वांग्यांचा दर कोसळला. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकाची निगा राखणे सोडावे लागले, कीटकनाशके फवारणीचेसुद्धा पैसे निघत नव्हता.- किशोर लुंगे, शेतकरी जामनी 

आज मी भेंडी विकायला नेली असता फक्त ८ रुपये किलोप्रमाणे विकावी लागली, केव्हा केव्हा तर  तोडणीचाही खर्च निघत नाही. बरेचदा माल मंडीत ठेऊन रित्या हाताने घरी परतावे लागते.-विजय बेलसरे, शेतकरी जामनी,

ग्राहकांना परडवेना

 भाजीपाल्याचे भाव फक्त भाजीमंडीतच कोसळतात, यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. कोसळलेल्या दराचा भाजीपाला मात्र दारावर येताच  याची दामदुप्पट होते व  नाईलाजाने तो घ्यावाच लागतो.- प्रगती भोयर,  गृहिणी, 

चवळीच्या शेंगा अन् भेंडीचे दर फारच कमी झाले म्हणते पण प्रत्यक्षात दारावर भाजीपाला घेतला तर मात्र भाजीपाला स्वस्त झाल्याचे जाणवत नाही , ४० रुपये किलोच्या खाली कोणताही भाजीपाला मिळत नाही.- आशाबाई पन्नासे,  गृहिणी,

भावात एवढा फरक का? 

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते, यामुळे आवक वाढली पण मागणीही घटली यामुळे चवळी शेंगा, वांगी व भेंडीची पुरती वाट लागली आहे,तसेच इतरही भाजीपालावर परिणाम झाला आहे,यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली,आणि चिल्लर भाजी विक्रेते त्यांचा वाहतूक व इतर खर्चवजा करून भाजीची विक्री करतात यामुळे ग्राहकाला याचा विशेष फायदा होत नाही, - प्रमोद फटिंग, भाजीपाला व्यापारी,

 

टॅग्स :vegetableभाज्याmarket yardमार्केट यार्ड