शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वांगी शेतकऱ्यांकडून 13 रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात 30 रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

 दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : हल्ली शेतकऱ्यांच्या  वांगी, भेंडी, चवळीसह इतरही भाजीपाल्यांचे भाव चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचा भाजीपाला  कवडीमोल भावाने खरेदी केला जातो, शेतकऱ्यांना  मिळालेल्या भावाच्या दुप्पट भावाने  ग्राहकांना विकला जातो, त्यामुळे  याचा कवडीचाही फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत नाही. भाजीपाल्याच्या  ढासळलेल्या भावबाजीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी   वांगी, भेंडी, चवळी या भाजीपाला वर्गीय उभ्या पिकात जनावरे सोडलीत, तर काहींनी पिकाची निगा राखणे सोडले, पावसाळ्याचे अडीच महिने संपले असताना आपल्या जिल्ह्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, असे असताना सुद्धा जिल्ह्यातील उत्पादित चवळी शेंगा, भेंडी, पालक, वांगी, काकडी, ढेमस आदी  भाजीपाल्याचे दर कोसळले यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीच्या कैचीत सापडला आहे.         दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या दरवाढीने मात्र, ग्राहकांच्याही खिशाला आर्थिक झळ पोहचत असून गृहिणींचेही बजेट कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

 यंदा तर भाजीपाला उत्पादनाचे वाटोळे झाले आहे. यावर्षी एक एकर शेतात वांग्याची लागवड केली, ऐन वांगी निघण्याच्या भरातच वांग्यांचा दर कोसळला. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकाची निगा राखणे सोडावे लागले, कीटकनाशके फवारणीचेसुद्धा पैसे निघत नव्हता.- किशोर लुंगे, शेतकरी जामनी 

आज मी भेंडी विकायला नेली असता फक्त ८ रुपये किलोप्रमाणे विकावी लागली, केव्हा केव्हा तर  तोडणीचाही खर्च निघत नाही. बरेचदा माल मंडीत ठेऊन रित्या हाताने घरी परतावे लागते.-विजय बेलसरे, शेतकरी जामनी,

ग्राहकांना परडवेना

 भाजीपाल्याचे भाव फक्त भाजीमंडीतच कोसळतात, यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. कोसळलेल्या दराचा भाजीपाला मात्र दारावर येताच  याची दामदुप्पट होते व  नाईलाजाने तो घ्यावाच लागतो.- प्रगती भोयर,  गृहिणी, 

चवळीच्या शेंगा अन् भेंडीचे दर फारच कमी झाले म्हणते पण प्रत्यक्षात दारावर भाजीपाला घेतला तर मात्र भाजीपाला स्वस्त झाल्याचे जाणवत नाही , ४० रुपये किलोच्या खाली कोणताही भाजीपाला मिळत नाही.- आशाबाई पन्नासे,  गृहिणी,

भावात एवढा फरक का? 

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते, यामुळे आवक वाढली पण मागणीही घटली यामुळे चवळी शेंगा, वांगी व भेंडीची पुरती वाट लागली आहे,तसेच इतरही भाजीपालावर परिणाम झाला आहे,यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली,आणि चिल्लर भाजी विक्रेते त्यांचा वाहतूक व इतर खर्चवजा करून भाजीची विक्री करतात यामुळे ग्राहकाला याचा विशेष फायदा होत नाही, - प्रमोद फटिंग, भाजीपाला व्यापारी,

 

टॅग्स :vegetableभाज्याmarket yardमार्केट यार्ड