शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

उभ्या पऱ्हाटीवर चालविला ‘रोटाव्हेटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी सदर शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला नाही.

ठळक मुद्देबोंदरठाणा येथील प्रकार : कृषी विभागाविषयी व्यक्त केला रोष

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : सततच्या पावसासह परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले. त्यातच गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. सदर संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या बोंदरठाणा येथील शेतकरी गुलाब चौधरी यांनी कृषी विभागाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करीत उभ्या पऱ्हाटीवर थेट रोटाव्हेटर चालविला. सदर प्रकारानंतरतरी कृषी विभाग जागा होईल काय, असा प्रश्न सध्या या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी गुलाब चौधरी यांनी यंदा तीन एकरात कपाशीची लागवड केली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस अंकुरलेल्या पिकासाठी नवसंजीवणी देणाराच ठरला. शिवाय पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, नंतर झालेल्या सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी सदर शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला नाही. सदर परिस्थितीला कृषी विभागच दोषी असल्याचा आरोप करीत शेतकरी गुलाब चौधरी यांनी उभ्या पऱ्हाटीवर रोटाव्हेटर चालविल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक वर्षी ६५ ते ७० क्विंटल कापसाचे उत्पन्न मला होते. परंतु, यंदा लावलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत होते. किमान रबी पीक घेऊन झालेल्या नुकसानाची भरपाई काढता येईल या हेतूने उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालविले. शिवाय सदर कपाशीच्या झाडाला पाहिजे तशी बोंडही येत नसल्याने हा निर्णय घेतला.- गुलाब चौधरी, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी