शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक निर्मूलनाबाबत कठोर

By admin | Updated: November 3, 2014 23:29 IST

फळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी

आर्वी पालिका ठोठावणार दंड : कारवाईच्या भीतीने दुकानदार धास्तावलेसुरेंद्र डाफ - आर्वीफळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. यात आर्वी नगर परिषदेने पाऊल उचलत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या थैल्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लस्टिक थैली वापरणाऱ्या दुकानदार, भाजी विक्रेते, फळविक्रेत्यावर कारवाई म्हणून १०० ते १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.आर्वीसह शहरातील तालुक्यातील सर्व किराणा दुकानदाराकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सर्रासपणे वापरात येत आहे. त्याचा आरोग्यासह पर्यांवरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले. दर दिवशी या प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट कशी लावावी याची डोकेदुखी आर्वी पालिका प्रशासनासमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या वापरावर बंदी आणल्यावरच प्रतिबंध बसू शकतो, असे पालिकेच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यावर व पर्यावरणावर विपरीत परिणाम करणाऱ्या या प्लास्टिकच्या थैल्यांवर शासनाने बंदी आदेश काढला; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आपल्याला दिसून येते. माहिती होऊनही कारवाई करण्यावर शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे अनेकवेळा समोर आले. दर आठवडी बाजारात ग्राहकांकडून वापरण्यात येणाऱ्या या प्लास्टिक पिशव्यांचे ढीग आर्वीत ठिकठिकाणी पाहायला मिळतात. तर नाल्यामध्ये त्या अडकून बसल्याने नाल्या तुंबतात. याची विल्हेवाट लावण्यासाठी कारवाई करण्याकरिता आर्वी पालिकेच्या या प्लास्टिक पिशव्यांचा खच गावाबाहेर सर्वत्र दिसून येतो. याच ढिगावर मोकाट जनावरे ताव मारत असतात. यात अनेक जनावरे प्लास्टिक खाऊन दगावल्याची उदाहरणे आहेत. आर्वी-वर्धा मार्गावर व आर्वी-पुलगाव मार्गावर या प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसून येत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या अस्वच्छतेचे दर्शन घडते. त्याची विल्हेवाट बंदी घातल्यावरच लागू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. शासनाने या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालूनही त्याचा सर्वत्र वापर होतो; परंतु न.प. प्रशासन, अन्न व औषध खाद्य विभाग यांनी या वापरावर बंदी घालण्यास कारवाई गरजेची आहे. शासन अपयशी ठरत आहे; यामुळे आर्वी पालिकेने त्याची अंमलबजावणी करण्याचवा निर्णय घेतला आहे. नियमबाह्य रित्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.