शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

परतीच्या पावसाने कपाशीचे उत्पन्न लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM

दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा कोण समजणार? : शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दरवर्षी दसऱ्याला पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात येते. यावर्षी पहिल्यांदा सतत एक महिना त्यानंतर २८ आॅक्टोबर व अगोदर झालेल्या परतीच्या पावसाने कपाशी पीक धोक्यात येऊन पिवळे पडले. त्यात ढगाळ वातावरणाने पावसाची बोंडे फुटली नाही. परिणामी, दिवाळी होऊनही कापसाची आवक अद्याप शेतकऱ्यांच्या घरात सुरू झालेली नाही. परतीच्या पावसाने कपाशी उत्पन्न लांबणीवर गेल्याने शेतकरी नैराश्याच्या खाईत लोटला गेला आहे. मात्र, त्याची ही अवस्था कोण समजून घेणार, हा प्रश्न आहे.आर्वी तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस, त्यानंतर ढगाळ वातावरण त्यामुळे कपाशी पिकाला दिवसाला १० ते १२ तासांच्या सूर्यप्रकाशाची गरज असताना शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली.तालुक्यात कपाशीची २३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी असून तालुका कॉटनचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडली. अतिपावसाने कपाशीला बुरशीची लागण झाल्याने दरवर्षी दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कपाशीची गंजी व आवक .दिसायची ती यावर्षी दिवाळीनंतर १० दिवस उलटूनही दिसत नाही. महागड्या फवारण्या, खते, सततच्या पावसाने वाढलेले तण यामुळे यावर्षी कपाशी पिकाचा खर्च दुप्पट झाला आहे. दिवाळी उलटूनही कापूस घरात येत नसल्याने झालेला खर्च तरी निघणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत.दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.शासनाने नुकसानभरपाऊ देण्याबाबत आदेश काढले. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सोयाबीनपाठोपाठ कापूस उत्पादक शेतकरीही यावर्षी संकटात सापडला आहे. अनेक भागात नोव्हेंबर महिना उजाडूनही वेचणीला सुरुवात झाली नाही. लावलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी निराश आहेत. शासनाने तातडीने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.माझ्याकडे ४ एकर कापूस लागवड आहे. परंतु अद्यापही शितादहीशिवाय कापूस वेचणीला सुरुवात झाली नाही. दरवर्षी दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरात भरून राहतो. मात्र यावर्षी सततच्या पावसाने कापसाची आवक मंदावली, झालेला खर्चही निघणार नाही. नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप कुणीही आले नाही.- भाष्कर चौकोने, कापूस उत्पादक शेतकरी, दहेगाव (मुस्तफा), ता. आर्वी.

टॅग्स :cottonकापूस