शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्षांकडे शेखर शेंडे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते कायम आपल्या विरोधात काम करीत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांचे पहिले राजीनामे घ्या; त्यांनी जर आपल्या विरोधात प्रचार केला तर आपण रणजित कांबळेंच्या विरोधात जाहीरपणे मंचावर जाऊन प्रचार करू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दिला.यासंदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांनाही माहिती दिली आहे. वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.यापूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे गटाच्या लोकांनी आपल्याविरोधात जाहीर प्रचार केला व आपला पराभव केला. हीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता आहे. रणजित कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तशी जाहीर वाच्यता करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात निवडणूक लढणे योग्य होणार नाही.त्यामुळे पक्षाने वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थक असलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन त्यांना कार्यमुक्त करावे; देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात जाहीररीत्या रणजित कांबळे यांच्या विरोधात सभा घेऊन प्रचार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता काँग्रेस या सदंर्भात काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.मागील दोन विधानसभा निवडणूकीत रणजीत कांबळे समर्थकांनी विरोधात काम केल्यामुळे आपण पराभूत झालो. आताही तीच वेळ येवू शकते. सेलूचे तालुकाध्यक्ष विजय जयस्वाल जाहिररीत्या आपले काम करणार नाही, असे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे कांबळे समर्थक सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यावे, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे.- शेखर शेंडे,प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे