शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

३०५ मोबाईलधारकांना ‘सायबर सेल’चा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:00 AM

तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही दिवसांत मोबाईलचा शोध लावल्या जात असल्याने नागरिकांचा विश्वास संपादित करण्यात पोलिसांचा हा विभाग अव्वल ठरू पाहत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात जबरी मोबाईल चोरी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा झडा लावत एकूण १० आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन मोबाईल ट्रेस झाले नसून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्दे२३ चोरट्यांना ठोकल्या बेड्या। विश्वास संपादनात ठरतेय अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत मोबाईल मिसींग बाबतच्या तब्बल १०१२ च्यावर तक्रारी सायबर सेल विभागाच्या पोलिसांना प्राप्त झाल्या. त्यापैकी ३०५ नागरिकांना त्यांचा मोबाईल परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा पोलिसांच्या या विशेष चमूने २३ मोबाईल चोरट्यांना हुडकून काढत त्यांना अटक केली आहे.तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही दिवसांत मोबाईलचा शोध लावल्या जात असल्याने नागरिकांचा विश्वास संपादित करण्यात पोलिसांचा हा विभाग अव्वल ठरू पाहत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात जबरी मोबाईल चोरी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा झडा लावत एकूण १० आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन मोबाईल ट्रेस झाले नसून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.तसेच घरफोडी बाबतची ११ गुन्हे दाखल झाली. त्यापैकी चार गुन्हे उघडकीस आणत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चोरी बाबतचे ३१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १० गुन्हे उघडकीस आणून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर २१ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे वर्ष २०१९ मध्ये मोबाईल मिसींग बाबतच्या एकूण १०१२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ३०५ तक्रारदारांना त्यांचा हरविलेला मोबाईल परत करण्यात पोलिसांना यश आले आहे.नवीन मोबाईल घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधील विविध कंपन्यांचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार प्राप्त होताच कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलच्या पोलिसांनी केला. इतकेच नव्हे तर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात सायबर सेलच्या चमूने या प्रकरणातील आरोपीला हुडकून काढत त्याच्याकडून तब्बल ९१ मोबाईल जप्त केले. २०१९ या वर्षात सदर गुन्ह्याचा छडा लावताना सायबर सेलने केलेली कामगिरी उल्लेखनीयच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल चोरट्यांना हुडकून काढल्या जात आहे. इतकेच नव्हे तर मोबाईल ट्रेस झाल्यावर त्याच्यावर करडी नजर ठेवली जाते. शिवाय अवघ्या काही तासात चोरट्यालाही जेरबंद केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Policeपोलिस