शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

३५३ शाळांचा शाळा सुरू करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९४१ शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शाळा दरवर्षी २६ जूनपासून सुरू होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे नवीन शैक्षणिक सत्रावर विरजण पडले. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे शाळा व्यवस्थापन समितीने मंजुरी दिल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय दिल्याने जिल्ह्यातील १ हजार २९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यापैकी ९४१ ठिकाणी झालेल्या सभेत शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून ३५३ शाळांनी मात्र, शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले. मात्र, शालेय सत्र चालविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून निर्णय घेण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीला दिली.त्यानुसार २६ जून रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. यात व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.जिल्ह्यातील १ हजार २९४ शाळांमध्ये झालेल्या बैठकीत ३५३ शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला असून ९४१ शाळांनी शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली.कोरोनाचा फैलाव बघता पालकही आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतील की नाही, याबाबत साशंकताच आहे. तरी पुढील निर्णय व्यवस्थापन समिती घेणार आहे.शिक्षकांमधील संभ्रम कायमच१५ जुन्या शासन परिपत्रकात विद्यार्थ्यांसाठी शाळा भरविण्याचे वेळापत्रक देण्यात आले. परंतु, शिक्षकांनी मात्र नेमके कधी शाळेत जावे, याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. शिवाय गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे एका पत्राद्वारे सुचविले आहे. परिपत्रकातील तरतूदी लक्षात घेता काही पं.स.च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दररोज १० ते ५ या कालावधीत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या असल्याने शिक्षकांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील १,२९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक२६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका पडला नसला तरी जिल्ह्यातील एक हजार २९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. बैठकीत विविध विषायांसह शाळा सुरू करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. काही शाळा सुरू करण्याबाबत होकार देण्यात आला असला तरी पालक पाल्यांना शाळेत पाठवतील का, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Schoolशाळा