शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:15 IST

Wardha News पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे.

 

वर्धा: पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या नागरिकांच्या तोंडाला पाणी सोडत असून नागरिक भाजी घेण्यासाठी प्रतीक्षेत राहत असल्याचे चित्र आहे.

आर्वी लगतच्या ब्राह्मणवाडा, टाकरखेड, काकडधरा, हिवरा, चोपन, सालफळ, किन्हाळा, उमरी, दाणापूर, पाचोड, बोथली, चोरांबा, वाढोणा आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांची पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.

रानभाज्यांची चव, आस्वाद घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात समरस व्हावे लागते. या भागातील आदिवासी व विविध जाणकर वनवासी हे जंगलाशी कायमस्वरूपी एकनिष्ठ असल्याने प्रत्येक ऋतूमधल्या इथला नैसर्गिक वातावरणाचा व बहुपयोगी औषधीयुक्त वनस्पतींचा मनमुरादपणे खवय्यांप्रमाणे आनंद उपभोगतो आहे.

पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या निघायला सुरुवात होते. या काळामध्ये आर्वीतील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील डाळ व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा फावल्या वेळी गरीब आदिवासी बंधूंना निसर्गाची साथ मिळते.

या रानमेव्यांचा मनसोक्त आस्वाद

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर ऑगस्टपर्यमत रानभाज्यांची रेलचेल असते. कटुले, तरोटा, वाॅसन, आरा, डोडा, बाना, गालंगा, काटा, चेरवाई, कटुलिच, करंज्या, पिठपापडा आदी रानभाज्यांचा नागरिक मनसोक्त आस्वाद घेतात. रानभाज्या औषधीयुक्त असल्याने शहरी लोकांनी जादा दोन पैसे खर्च करून या रानमेव्यावर ताव मारावा, अशी ग्रामीण भागातील आदिवासी व जंगलातील नागरिकांची भावना आहे.

रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तरोटा, कटुले या मोसमात सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे आर्वीच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा आर्वीच्या जनतेने आस्वाद घ्यावा.

अविनाश टाके

सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांना जीवनसत्त्वयुक्त भाज्या खायला मिळत नाहीत, त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो. परंतु लोकांनी आर्वीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा वापर आपल्या जेवणात केल्यास शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. म्हणून प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षारयुक्त असलेल्या भाज्या आहारात समाविष्ट करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.

उमेश आसटकर

टॅग्स :vegetableभाज्या