शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:15 IST

Wardha News पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे.

 

वर्धा: पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या नागरिकांच्या तोंडाला पाणी सोडत असून नागरिक भाजी घेण्यासाठी प्रतीक्षेत राहत असल्याचे चित्र आहे.

आर्वी लगतच्या ब्राह्मणवाडा, टाकरखेड, काकडधरा, हिवरा, चोपन, सालफळ, किन्हाळा, उमरी, दाणापूर, पाचोड, बोथली, चोरांबा, वाढोणा आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांची पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.

रानभाज्यांची चव, आस्वाद घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात समरस व्हावे लागते. या भागातील आदिवासी व विविध जाणकर वनवासी हे जंगलाशी कायमस्वरूपी एकनिष्ठ असल्याने प्रत्येक ऋतूमधल्या इथला नैसर्गिक वातावरणाचा व बहुपयोगी औषधीयुक्त वनस्पतींचा मनमुरादपणे खवय्यांप्रमाणे आनंद उपभोगतो आहे.

पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या निघायला सुरुवात होते. या काळामध्ये आर्वीतील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील डाळ व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा फावल्या वेळी गरीब आदिवासी बंधूंना निसर्गाची साथ मिळते.

या रानमेव्यांचा मनसोक्त आस्वाद

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर ऑगस्टपर्यमत रानभाज्यांची रेलचेल असते. कटुले, तरोटा, वाॅसन, आरा, डोडा, बाना, गालंगा, काटा, चेरवाई, कटुलिच, करंज्या, पिठपापडा आदी रानभाज्यांचा नागरिक मनसोक्त आस्वाद घेतात. रानभाज्या औषधीयुक्त असल्याने शहरी लोकांनी जादा दोन पैसे खर्च करून या रानमेव्यावर ताव मारावा, अशी ग्रामीण भागातील आदिवासी व जंगलातील नागरिकांची भावना आहे.

रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तरोटा, कटुले या मोसमात सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे आर्वीच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा आर्वीच्या जनतेने आस्वाद घ्यावा.

अविनाश टाके

सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांना जीवनसत्त्वयुक्त भाज्या खायला मिळत नाहीत, त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो. परंतु लोकांनी आर्वीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा वापर आपल्या जेवणात केल्यास शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. म्हणून प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षारयुक्त असलेल्या भाज्या आहारात समाविष्ट करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.

उमेश आसटकर

टॅग्स :vegetableभाज्या