शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:15 IST

Wardha News पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे.

 

वर्धा: पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या नागरिकांच्या तोंडाला पाणी सोडत असून नागरिक भाजी घेण्यासाठी प्रतीक्षेत राहत असल्याचे चित्र आहे.

आर्वी लगतच्या ब्राह्मणवाडा, टाकरखेड, काकडधरा, हिवरा, चोपन, सालफळ, किन्हाळा, उमरी, दाणापूर, पाचोड, बोथली, चोरांबा, वाढोणा आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांची पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.

रानभाज्यांची चव, आस्वाद घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात समरस व्हावे लागते. या भागातील आदिवासी व विविध जाणकर वनवासी हे जंगलाशी कायमस्वरूपी एकनिष्ठ असल्याने प्रत्येक ऋतूमधल्या इथला नैसर्गिक वातावरणाचा व बहुपयोगी औषधीयुक्त वनस्पतींचा मनमुरादपणे खवय्यांप्रमाणे आनंद उपभोगतो आहे.

पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या निघायला सुरुवात होते. या काळामध्ये आर्वीतील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील डाळ व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा फावल्या वेळी गरीब आदिवासी बंधूंना निसर्गाची साथ मिळते.

या रानमेव्यांचा मनसोक्त आस्वाद

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर ऑगस्टपर्यमत रानभाज्यांची रेलचेल असते. कटुले, तरोटा, वाॅसन, आरा, डोडा, बाना, गालंगा, काटा, चेरवाई, कटुलिच, करंज्या, पिठपापडा आदी रानभाज्यांचा नागरिक मनसोक्त आस्वाद घेतात. रानभाज्या औषधीयुक्त असल्याने शहरी लोकांनी जादा दोन पैसे खर्च करून या रानमेव्यावर ताव मारावा, अशी ग्रामीण भागातील आदिवासी व जंगलातील नागरिकांची भावना आहे.

रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तरोटा, कटुले या मोसमात सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे आर्वीच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा आर्वीच्या जनतेने आस्वाद घ्यावा.

अविनाश टाके

सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांना जीवनसत्त्वयुक्त भाज्या खायला मिळत नाहीत, त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो. परंतु लोकांनी आर्वीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा वापर आपल्या जेवणात केल्यास शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. म्हणून प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षारयुक्त असलेल्या भाज्या आहारात समाविष्ट करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.

उमेश आसटकर

टॅग्स :vegetableभाज्या