शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:15 IST

Wardha News पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे.

 

वर्धा: पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या नागरिकांच्या तोंडाला पाणी सोडत असून नागरिक भाजी घेण्यासाठी प्रतीक्षेत राहत असल्याचे चित्र आहे.

आर्वी लगतच्या ब्राह्मणवाडा, टाकरखेड, काकडधरा, हिवरा, चोपन, सालफळ, किन्हाळा, उमरी, दाणापूर, पाचोड, बोथली, चोरांबा, वाढोणा आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांची पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.

रानभाज्यांची चव, आस्वाद घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात समरस व्हावे लागते. या भागातील आदिवासी व विविध जाणकर वनवासी हे जंगलाशी कायमस्वरूपी एकनिष्ठ असल्याने प्रत्येक ऋतूमधल्या इथला नैसर्गिक वातावरणाचा व बहुपयोगी औषधीयुक्त वनस्पतींचा मनमुरादपणे खवय्यांप्रमाणे आनंद उपभोगतो आहे.

पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या निघायला सुरुवात होते. या काळामध्ये आर्वीतील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील डाळ व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा फावल्या वेळी गरीब आदिवासी बंधूंना निसर्गाची साथ मिळते.

या रानमेव्यांचा मनसोक्त आस्वाद

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर ऑगस्टपर्यमत रानभाज्यांची रेलचेल असते. कटुले, तरोटा, वाॅसन, आरा, डोडा, बाना, गालंगा, काटा, चेरवाई, कटुलिच, करंज्या, पिठपापडा आदी रानभाज्यांचा नागरिक मनसोक्त आस्वाद घेतात. रानभाज्या औषधीयुक्त असल्याने शहरी लोकांनी जादा दोन पैसे खर्च करून या रानमेव्यावर ताव मारावा, अशी ग्रामीण भागातील आदिवासी व जंगलातील नागरिकांची भावना आहे.

रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तरोटा, कटुले या मोसमात सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे आर्वीच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा आर्वीच्या जनतेने आस्वाद घ्यावा.

अविनाश टाके

सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांना जीवनसत्त्वयुक्त भाज्या खायला मिळत नाहीत, त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो. परंतु लोकांनी आर्वीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा वापर आपल्या जेवणात केल्यास शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. म्हणून प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षारयुक्त असलेल्या भाज्या आहारात समाविष्ट करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.

उमेश आसटकर

टॅग्स :vegetableभाज्या