शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पाऊस बेपत्ता; सोयाबीनने टाकली मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:28 AM

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट : फुलेही गळाली; कपाशीलाही फुले, पात्या नाही, जलसाठ्यात ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही. परिणामी, सोयाबीनचे उत्पन्न गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शिवाय कपाशीचीही तिच अवस्था आहे. पाऊस नसल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. यामुळे कपाशीलाही फुले-पात्या येत नसल्याने त्याच्या उत्पन्नाची आशा धूसर झाली आहे.आतापर्यंत आलेल्या पावसामुळे पिके हिरवी दिसत होती; पण जलसाठ्यात पाण्याचा थेंब नव्हता. पावसाअभावी जलसाठेही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे रबी हंगामही आताच धोक्यात आला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस येईल, असे चित्र निर्माण होते; पण काही काळातच आकाश पुन्हा निरभ्र होऊन उन्ह तापते. यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे.यंदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सर्वत्र भक्कम पाऊस पडेल, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या; पण त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या परिस्थितीतही जिल्ह्यात दीड लाख हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा झाला आहे तर अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात आज-उद्या पाऊस येईल, असे वाटत असताना आता पावसाची आशाही मावळली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरड्या दु्ष्काळाची चिन्हे आहेत.पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतकºयांचा सण पोळा तोंडावर आला आहे. याच काळात पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे पोळ्याचा सण कसा करावा, असा विचार शेतकरी करीत आहेत. शेतात पिकांनी टाकलेल्या माना आणि गाठीला नसलेला पैसा, यामुळे शेतकºयांची चांगलीच वाताहत झाल्याचे चित्र आहे. यातच कर्जमाफीचाही आधार मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी जोर धरत आहे.