नऊ वर्षीय रूपेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:02 AM2019-02-03T00:02:21+5:302019-02-03T00:03:06+5:30

नऊ वर्षीय चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. हे चर्चित खून प्रकरण वर्धा शहरातील असून रेणुका हिरामण मुळे असे या दुदैर्वी आईचे नाव आहे.

Punish the killers of nine-year-old Rupesh | नऊ वर्षीय रूपेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा

नऊ वर्षीय रूपेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा

Next
ठळक मुद्देमातेची उच्च न्यायालयाला विनंती : बहुचर्र्चित नरबळी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नऊ वर्षीय चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. हे चर्चित खून प्रकरण वर्धा शहरातील असून रेणुका हिरामण मुळे असे या दुदैर्वी आईचे नाव आहे.
पोटचा गोळा रूपेश याचा अमानुष खून झाला आहे. या प्रकरणात नऊ आरोपी असून त्यात आसिफ शहा ऊर्फ मुन्ना पठाण (४६) या मुख्य आरोपीसह उत्तम महादेव पोहणे, अंकुश सुरेश गिरी, दिलीप बाळकृष्ण भोगे, सुरेश रामराव धानोरे, सुभाष बापूराव भोयर, विनोद ऊर्फ बंसी किसन क्षीरसागर व सतीश प्रभाकर कलोडे यांचा समावेश आहे. १ जुलै २०१७ रोजी सत्र न्यायालयाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून या सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाला रेणुका मुळे यांनी अपीलद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी रूपेशचे अपहरण करून अमानुष खून करण्यात आला होता. दुसºया दिवशी ईसाजी ले-आऊट परिसरात रूपेशचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे शरीर छिन्नविछीन्न करण्यात आले होते. डोळे, किडनी, गुप्तांग, मोठे आतडे आदी अवयव काढून घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपी पठाण याला १५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या बयानावरून अन्य आरोपींना अटक झाली होती. आरोपींनी गुप्तधनाकरिता व अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा खून केला, असे रेणुका मुळे यांचे म्हणणे आहे.

आरोपींना अटक करण्याचे आदेश
या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख आणि रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, राज्य सरकार सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता मुळे यांचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले. तसेच, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३९० अंतर्गत प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून सत्र न्यायालयासमक्ष हजर करण्याचा आदेश दिला. सदर कलमातील तरतुदीनुसार सत्र न्यायालय हे अपील प्रलंबित असेपर्यंत आरोपींना कारागृहात पाठवू शकते किंवा त्यांना जामिनावर सोडू शकते. रेणुका मुळे यांच्यावतीने अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बाजू मांडली.

Web Title: Punish the killers of nine-year-old Rupesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून