शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:46 AM

जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.रेहकी शिवारात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु, करारानुसार संबंधितांकडून ऊसतोड करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. यामुळेच मिळणाऱ्या मोबदल्यातही घट होत आहे. उसाची तोड निर्धारित वेळेत झाली तर दुसरे उत्पादनही घेता येते, परंतु त्यातही नुकसान होत आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाला जंगली जनावरांपासून भयंकर त्रास असून तेसुद्धा पिकाला नुकसान पोहचवित आहे.दुहेरी नुकसानामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असून वनविभागाकडून व साखर कारखान्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर सुरेश लाडे, फुलचंद झाडे, दामोदर झाडे, संजय घुमडे, गणेश झाडे, अशोक रघाटाटे, रवींद्र शिंदे, राजू पोहणे, देवराव हुडे, नामदेव शिंदे, श्रीकांत धानकुटे, सुरेश झाडे, संजय रघाटाटे, पुरुषोत्तम घुमडे, रवींद्र सावरकर, भास्कर मुजबैले यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.रेहकीत नुकसानीचे सर्वेक्षणशेतपिक नुकसानीच्या प्रकरणाला प्राथमिकता दिली जाते, कार्यालयात एकही प्रकरण प्रलंबित नाही, अर्ज आल्याबरोबर प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यात येते. आज पासूनच रेहकी शिवारात शेतपिक नुकसानाचे सर्व्हे सुरू करण्यात आले आहेत. जंगली जनावरांनी नुकसान केल्याचे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यास शासन नियमाप्रमाणे तातडीने भरपाई देण्यात येईल, असे झडशी सहवन क्षेत्राचे क्षेत्राधिकारी कमलाकर वाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी