शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वर्धा जिल्ह्यातील ४८.८ कोटींचा निम्न प्रकल्प पोहोचला २ हजार ३६५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:16 IST

धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. या प्रकल्पाला मूर्त रूप देण्याचे काम सुरू असले असले तरी अद्याप अर्धवटच आहे.

ठळक मुद्दे२६ वर्षांपूर्वी मंजुरी ३६ हजार हेक्टर सिंचनक्षमतेचा अंदाज

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. या प्रकल्पाला मूर्त रूप देण्याचे काम सुरू असले असले तरी अद्याप अर्धवटच आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होईल, असा प्राथमिक अंदाज होता. ३१ गेट असलेल्या हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्प कधी पूर्णत्वास जाणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.धनोडी (बहाद्दरपूर) येथे १ जानेवारी १९८१ रोजी निम्न वर्धा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. ३६ हजार ३३५ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या ४८.०८ कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या या प्रकल्पाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. पण, तो २०१८ पर्यंतही पूर्ण होऊ शकला नाही. एकंदरीत निम्न वर्धा प्रकल्प शासकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत अडकला आहे. विहीत मुदतीत प्रकल्प पूर्ण न झाल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली.बांधकाम साहित्याच्या किमती वधारल्याने आजपर्यंत तीनवेळा वाढीव सुधारीत दराने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पाची किंमत २,३६५.०८ कोटी रुपये झाली आहे. या निधीलाही शासनाने १८ आॅगस्ट २००९ रोजी मंजुरी दिली. निम्न वर्धा प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील ४६ गावे व अमरावती जिल्ह्यातील १७ गावे वंचित झाली आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे १६ हजार ५६६ व्यक्ती प्रभावीत झाल्या. ६३ बाधीत गावांपैकी २९ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. ही कामे ९५ टक्केच पूर्ण झालीत. उर्वरित गावांना अद्याप मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांत असंतोष आहे.निम्न वर्धा प्रकल्पाच्या निर्मितीप्रसंगी ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन शक्य असल्याचे सांगण्यात आले होते. पण, २६ वर्षांचा कालावधी लोटला असताना प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. मुख्य कालव्याचे खोदकाम करण्यात आले, ते अपूर्णच आहे. काही ठिकाणी सिमेंटीकरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी केवळ खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. या कालव्यात बुडून पुलगाव, नाचणगाव परिसरातील अनेक युवकांचा मृत्यू झाला. पण, कालव्याचे काम पुढे सरकले नाही. आजही पुलगाव येथे कालवा खोदकाम केलेल्या स्थितीतच आहे. यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली जात असली तरी कृती मात्र नाही.

धरण परिक्षेत्रात अतिरिक्त जमीन पडित आहे. या जमिनीवर पर्यटनस्थळ तयार केल्यास या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.सुधीर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी.

टॅग्स :Damधरण