शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत व्यापाऱ्यांनी गोदाम अडविल्याने अडचण

By admin | Updated: February 26, 2017 00:53 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्डवर जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कोणतीही पूर्व सूचना

पूर्व सूचना नाही : शेतकऱ्यांचा शेतमाल येताच खरेदी झाली बंद; अनेकांनी नेला माल परत पुरूषोत्तम नागपुरे   आर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्डवर जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक शेतकऱ्यांच्या उत्पादनाची खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांवर बाजारात आणलेले उत्पादन आर्थिक फटका सहन करीत परत नेण्याची वेळी आली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या बेताल कारभाराचे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. यामुळे ही बाजार समिती शेतकरी हिताची की, व्यापारी धार्जीनी अशी चर्चा जोर धरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर खरेदी केलेल्या शेतमालाचा काटा करून व्यापाऱ्यांनी त्याची लगेच उचल करावी, असा नियम आहे. येथे हा नियम धाब्यावर बसवून येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाची साठवणूक मार्केट यार्डमधील गोदामात तसाच ठेवतात. यामुळे गोदाम अडून राहत असल्याचे येथील चित्र आहे. अशातच गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक वाढली, परिणामी शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता जागाच शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपली तूर उघड्यावर ठेवली. अशातच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही पूर्व सूचना न देता गुरूवारपासून अचानक खरेदी बंद केली. याची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत आपला शेतमाल तसाच परत न्यावा लागला. कृषी उत्पन्न बाजार समितीने गोदाम अडवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांकडून जागा खाली करून घेतली असती तर, शेतकऱ्यांवर माल परत नेण्याची वेळ आली नसती; मात्र, आर्थिक मलाईच्या लालसेपोटी शेतकरी हितापेक्षा व्यापारी हिताला महत्त्व देण्याच्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या संतापजनक कारभाराचे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसात उमटू लागले आहेत. शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना लगेच मालाची उचल करण्यास भाग पाडले असते तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल परत नेण्याची वेळ आली नसती. बाजार समितीने केवळ व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्याकरिता नियमला बगल दिल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. येथे जोपर्यंत व्यापाऱ्याची खरेदी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो आपला माल उचलत नाही, असे असताना बाजार समितीकडूनही त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देत संचालक मंडळाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. मार्केट यार्डवर प्रमाणापेक्षा जास्त माल झाला होता. खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते म्हणून शेतकऱ्यांनीच काही दिवस खरेदी करणे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेवरून एक सभा बोलवून चार दिवस खरेदी बंद ठेवण्यात आली. सोमवारपासून खरेदी सुरू होणार आहे. - विनोद कोटेवार, सचिव, कृ.उ.बा. समिती, आर्वी.