शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

बारशाला गेला अन् बाराव्याला आला, काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांची थट्टाच - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 10:33 IST

पंतप्रधान मोदी यांनी वर्धेत विरोधकांचा घेतला समाचार 

रवींद्र चांदेकर / प्रदीप भाकरे, लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/अमरावती : २०१४ पूर्वी देशात अनेक सिंचन प्रकल्प अडकून पडले. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील होते. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या प्रकल्पांना आम्ही निधी दिला. त्यामुळे त्यांना पुनरुज्जीवन मिळाले. ‘बारशाला गेला अन् बाराव्याला आला,’ अशी एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. काँग्रेसने अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्यांची केली होती, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोडले. 

वर्धा व अमरावती मतदारसंघासाठी प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वर्धाचे भाजप उमेदवार रामदास तडस, अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा आदी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ज्यांची काँग्रेसच्या काळात विचारपूसही केली नव्हती त्याच गोरगरीब, शेतकरी, मजुराला या गरिबाच्या सुपुत्राला साक्षात पुजले आहे. या वर्गाचा विकास हाच आमच्या केंद्रस्थानी आहे. दहा वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढण्याची किमया आम्ही करून दाखविली.

पाइपलाइनद्वारे गॅस किचनपर्यंत प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांना वयानुसार विविध आजारांना सामाेरे जावे लागते. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याबाबतची काळजी म्हणून ७० वर्षांवरील ज्येष्ठांना पाच लाखांपर्यंत आरोग्य मोफत उपचार मिळेल, तसेच प्रत्येक घरातील किचनपर्यंत पाइपलाइनने गॅस पाेहोचविला जाईल, अशी ग्वाही मोदींनी दिली. 

३२ मिनिटे ५९ सेकंदांचे भाषणपंतप्रधान मोदी यांनी आपल्या ३२ मिनिटे ५९ सेकंदांच्या भाषणात ‘इंडिया आघाडी’ हा शब्द टाळला. प्रत्येक वेळी ते ‘इंडी’ आघाडी असाच उल्लेख करत होते. आपण यापूर्वीदेखील वर्धेला प्रचारासाठी आलो. मात्र, यंदा उसळलेल्या गर्दीने मागील सभेचा रेकॉर्ड मोडल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :wardha-pcवर्धाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस