शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

रासायनिक खतांचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:44 IST

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या; पण त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. सध्या स्थितीत शेतकरी उभ्या तूर, सोयाबीन व कपाशी पिकांची निगा घेत त्यांना खत देत विविध औषधांची त्यावर फवारणी करीत आहेत. अशातच यंदा मे महिन्याच्या तुलनेत ...

ठळक मुद्देविक्रीवर परिणाम : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या; पण त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. सध्या स्थितीत शेतकरी उभ्या तूर, सोयाबीन व कपाशी पिकांची निगा घेत त्यांना खत देत विविध औषधांची त्यावर फवारणी करीत आहेत. अशातच यंदा मे महिन्याच्या तुलनेत सध्या खतांच्या दरात सरासरी सव्वाशे रुपयांनी वाढ झाल्याने शेतकºयांच्या अडचणी भर पडली आहे. शिवाय विक्रीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे कृषी केंद्र व्यावसायिक सांगतात.निसर्गाच्या लहरीपणाचा गत तीन वर्षांपासून शेतकºयांचा आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. अशातच गत वर्षी तूर, सोयाबीन व कापूस पिकाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळाला नाही. त्यावेळी शेतकºयांच्या अडचण लक्षात घेवून अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूकच करण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. यंदाच्या वर्षीतरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून विविध शेतमाल निघण्यापूर्वीच विविध पिकांना देण्यात येणारा भाव सरकारने निश्चित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.यंदाच्या मे महिन्यात युरीयाची ५० किलोची बॅग २९५ रुपयांना, पोट्याशची ५८० रुपयांना, १०/१६/१६ खत १ हजार ४५ रुपये, १२/३२/१६ खत १ हजार ५५ रुपये, १८/४६/० डिएपी १ हजार ८५ रुपयांना बाजारात विक्रीकरिता उपलब्ध होते. परंतु, जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्याच्या सुरूवातीला युरीयाची ४५ किलोची बॅग २६६.५० रुपयांना, पोट्याशची बॅग ७४० रुपयांना, १०/१६/१६ खत १ हजार १६० रुपये, १२/३२/१६ खत १ हजार १७० रुपये तर १८/४६/० डिएपी १ हजार ३४० रुपयांना विक्री होत आहे. खतांच्या दरात सुमारे १२५ ते १५० रुपयांनी वाढ झाली असून याचा आर्थिक फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.वस्तूसेवा कराने वाढविली डोकेदुखीखत, बियाणे, औषधे आदी शेतीसाहित्यांवर सरकारने वस्तूसेवा कर लादला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरूपात पैसा येत असला तरी लादण्यात आलेल्या वस्तूसेवा करने शेतकऱ्यांसह कृषी केंद्र व्यावसायिकांची डोकेदुखीच वाढविली असल्याचे बोलले जात आहे.माल एकच; पण कंपन्यांचे दर वेगवेगळेफर्टीलाईझर साहित्यावर सरकारने ५ टक्के, औषधांवर १८ टक्के तर काही कृषी साहित्यांवर १८, २४ व १२ टक्के वस्तूसेवा कर लावला आहे. सध्या हा वस्तूसेवा कर शेतकºयांसह कृषी केंद्र व्यावसायिकांच्या अडचणीत भर टाकत असून खतांचा माल एकच असताना वेगवेगळ्या कंपन्या आपले प्रोडक्शन वेगवेगळ्या दरात विकत आहेत. त्यामुळे अधिकचा आर्थिक फटकाच शेतकºयांना सहन करावा लागत आहे.काँग्रेसची सत्ता असताना शेतकºयांना खतावर सवलत दिली जात होती. परंतु, सध्या ती सवलत दिली जात नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांच्या सौभाग्यवतीचे मंगळसूत्र गहाण ठेवूनच शेतीउपयोगी साहित्याची खरेदी करावी लागत असल्याचे वास्तव आहे.वस्तूसेवा करामुळे कृषी केंद्र व्यावसायिकांच्या व शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय करताना सध्या विचारपुर्वकच करावा लागत आहे. स्पर्धेच्या युगात शेतकºयांची फसगत होत असल्याचे वास्तव आहे. शेतकºयांनीही दक्ष राहून विविध साहित्याची खरेदी करावी.- रवी शेंडे, अध्यक्ष, कृषी केंद्र व्यावसायिक असो.खतांच्या दरात अवघ्या दोन महिन्यांच्या आत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांगलाच आर्थिक फटका सहन सध्या करावा लागत आहे. शेती करताना जो खर्च होतो त्या तुलनेत हंगामाच्या अखेरीस विविध शेतमालाला भाव मिळत नाहीत. सरकारने शेतमालांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव जाहीर करावा.- सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे.बहूदा कृषी केंद्र चालक घेतलेल्या साहित्याचे बिल देण्यास टाळाटाळ करतात. शिवाय काही कृषी केंद्र चालक उधारीत साहित्य देताना देयकाची वसूली व्याजासह करतात. हा प्रकार बंद झालाच पाहिजे. शिवाय होणारी शेतकºयांची पिळवणूक थांबली पाहिजे.- राहूल चौधरी,शेतकरी, गोविंदपूर.