शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:08+5:30
वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते.

शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे
वर्धा : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कारखानदारी वस्तूंची अधिकतम विक्री किंमत निर्मिती मूल्यापेक्षा अधिकतम विक्री किंमत कितीतरी पटीने जास्त असते. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. किरकोळ व्यापारी एमआरपीनुसारच वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे सर्वसामान्याची खूप लूट होत असून महागाई वाढतच आहे. त्यामुळे वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली.
शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते. ती अतिशय कमी म्हणजे उत्पादन किमतीपेक्षाही कमी असते.
त्यामुळे शेतीकरिता लागलेला खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट व गंभीर होते. जर कारखानदारी उत्पादन वस्तूंवर जास्तीत जास्त विक्री किंमत (एम.आर.पी.) नमूद असते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूंवर (एल.आर.पी.) जीवन जगण्याएवढी विक्री किंमत शासनाने निर्धारित करावी.
शेतकºयांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के जीवन जगण्याएवढ्या श्रमाची किंमत (एल.आर.पी.) निर्धारित केल्यास त्याला जीवन जगण्याएवढे उत्पन्न शेतीतून प्राप्त होऊ शकते. यामुळे तो आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाही, असे अग्निहोत्री म्हणाले.
या मुद्यांकडे शासनाने लक्ष द्यावे
शासनाने आवश्यक उपाययोजना म्हणून सर्व वस्तूंच्या उत्पादन किमतीबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या वस्तूंची अधिकतम विक्री किंमत ठरवावी, म्हणजे वस्तूंच्या किंमती आपोआपच कमी होईल. परिणामी महागाई कमी होईल आणि जनसामान्याचे जीवन सुखमय होईल, असे पत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविल्याचेही व्यासपीठावर बोलताना शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.