शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

नागपूर-यवतमाळ महामार्गालगत शेतीला एकरी तब्बल कोटीचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीला तिप्पट भाव देण्यात आल्यानेही शेतजमिनीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. नागपूर - यवतमाळ महामार्गाशेजारील शेतजमिनीला सर्वाधिक भाव मिळत असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शेतजमिनींचे वेगवेगळ्या भावात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. मोठमोठाले लॅंड डेव्हलपर शेतजमिनींवर प्लॉट टाकत असल्याने सध्या महामार्गाशेजारी असलेल्या पडिक शेतीलाही चांगला भाव मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात साडेतीन दशकांपूर्वी शेतजमिनीला कवडीमोलच भाव मिळत होता. पण आता परिस्थिती बदलली असून, नागपूर - यवतमाळ महामार्गाशेजारील शेतजमिनींना कोटींच्या घरात भाव मिळत असल्याने अनेकांकडून ‘भाऊ वावर है तो पावर है’ असेच म्हटले जात आहे.साडेतीन दशकांपूर्वी कोरडवाहू शेती २० हजार रुपये एकर तर ओलिताची शेती ४० हजार रुपये एकरप्रमाणे मिळायची. तर आता जिल्ह्यातून महासमृद्धी, नागपूर - तुळजापूर हे महत्त्वाचे महामार्ग गेल्याने शिवाय सिंदी रेल्वे तसेच नागपूर जिल्ह्यातील गुमगाव येथे मिहान प्रकल्प आल्याने शेतजमिनीच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीला तिप्पट भाव देण्यात आल्यानेही शेतजमिनीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. नागपूर - यवतमाळ महामार्गाशेजारील शेतजमिनीला सर्वाधिक भाव मिळत असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शेतजमिनींचे वेगवेगळ्या भावात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. मोठमोठाले लॅंड डेव्हलपर शेतजमिनींवर प्लॉट टाकत असल्याने सध्या महामार्गाशेजारी असलेल्या पडिक शेतीलाही चांगला भाव मिळत आहे. सर्वाधिक महागडी शेती वर्धा तालुक्याची असून, स्वस्त आष्टी तालुक्यात आहे. वर्धा-वायगाव मार्गावर शेती घ्यायची असल्यास एका एकरला ५० लाख रुपये मोजावे लागतात तर वर्धा-नागपूर मार्गावरील शेतीसाठी कोटींची रक्कमच मोजावी लागते. सरासरी जिल्ह्यात कोरडवाहू शेती  ५ लाख रुपयांपासून ते ५० लाखापर्यंत आहेत, तर सिंचनाच्या शेतीचा २० लाखांपासून ते  एक करोडपर्यंत भाव आहे. वर्धालगतच्या शेतीला विक्रीकर चौरस मीटरप्रमाणे आकारल्या जातो. यामुळे विक्रीचा खर्च अधिक येतो.

कोरडवाहूपेक्षा ओलिताच्या शेतीला चांगला भाव-    जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास कोरडवाहू शेतीच्या तुलनेत ओलिताची सोय असलेल्या शेतीला चांगलाच भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

१५ वर्षांत वाढले शेतीचे भावनागपूर जिल्ह्यातील मिहान प्रकल्पामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतीचे अधिक प्रमाणात पैसे मिळाले. यामुळे तेथील शेतकरी वर्धा जिल्ह्यात शेती घेऊ लागले. तसेच  ले-आऊटसाठी मोठ्या प्रमाणात शेती खरेदी केली जात असल्याने १५ वर्षांपासून शेतीचे भाव वाढले आहेत. जिल्ह्यातून महामार्ग गेलेल्यानेही शेतीचे भाव वधारले आहे.

सर्वात जास्त भाव वर्धा तालुक्यातजिल्ह्याचे ठिकाण असल्याने वर्धा शहराशेजारील शेतीला जिल्ह्यातील इतर परिसराच्या तुलनेत जास्तच भाव मिळत आहे. विविध महामार्गांशेजारी ले-आऊटही टाकले जात असल्याने सर्वात जास्त भाव वर्धा तालुक्यातच असल्याचे दिसून येते.

शहराशेजारी असलेल्या पडिकचा ले-आऊटसाठी वापर...

वर्धा तालुक्यातील बऱ्याच भागात विविध प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. याशिवाय काही महामार्गही या तालुक्यातून गेले आहेत. शिवाय ले-आऊटसाठी शेतीची खरेदी केली जात असल्याने शेतीच्या भावात चांगलीच तेजी आली आहे.- गणेश चौधरी, शेतकरी, वर्धा

आष्टी तालुक्यात शेतीला पाहिजे तसा भाव मिळत नाही. येथे काही महत्त्वाकांशी प्रकल्पही नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती असून, ३ ते ४ लाख रुपये एकरप्रमाणे शेती खरेदी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या शेतीचा थाेडा चांगला भाव मिळतो.- श्रीधर ठाकरे, शेतकरी, आष्टी.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गagricultureशेती