अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:15+5:30

तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टमाटर बागेकरिता लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही, अशी व्यथा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे

Premature rain, loss of millions of rupees due to corona | अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान

अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान

ठळक मुद्देतालुक्यातील शेतकरी संकटात, टमाटर, भाजीपाल्याच्या बागा उद्ध्वस्त

विजय चौधरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यातील कन्नमवारग्राम आजनडोह, बांगडापूर, हेटीकुंडी, काजळी, कारंजा परिसरात १५ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. तर कोरोनामुळे लॉकडाऊन तसेच नागपूर बाजारपेठेमध्ये वाहतुकीची होत असलेली कोंडी अशा अनेक समस्यांमुळे बाजारपेठेत पडलेले भाजीपाल्याचे भाव तसेच वारंवार बदलत असलेली बाजारपेठेची जागा यामुळे भाजीपाला बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टमाटर बागेकरिता लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही, अशी व्यथा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे
तालुक्यातील बागांतीले भाजीपाला नागपूर बाजारपेठेत मध्ये नेण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याने नागपूर महानगरपालिका प्रशासनाने भाजीपाला मार्केट अनेक ठिकाणी हलविले, तर काही मार्केट बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नागपूर येथे नेलेला शेतीमाल परत आणून फेकावा लागला. किंवा बेभाव विकावा लागत आहे. भाजीपाला बागांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत करण्याची मागणी होत आहे.

दरवर्षी टमाटर उत्पादनातून सात ते आठ लाख रुपयाचे उन्हाळी उत्पादन घेतो. यावर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे बाजारपेठेत आलेली मंदी व पडलेले भाव यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. जूनपर्यंत चालणारी टमाटर बाग आताच उद्ध्वस्त झाली आहे.
अंबादास डिग्रसे, भाजीपाला उत्पादक, आजनडोह

Web Title: Premature rain, loss of millions of rupees due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.