हवाई सफरसाठी प्रणवची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:22 IST2018-06-25T23:22:33+5:302018-06-25T23:22:53+5:30
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे मोती उपक्रमांंतर्गत आर्वी शहरातील प्रणव काळे हा विद्यार्थी २६ जून रोजी हवाई सफर करणार आहे.

हवाई सफरसाठी प्रणवची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे मोती उपक्रमांंतर्गत आर्वी शहरातील प्रणव काळे हा विद्यार्थी २६ जून रोजी हवाई सफर करणार आहे. तो दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन संवाद साधणार आहे.
‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आली. येथील विद्यानिकेतन शाळेतील आठव्या वर्गातील विद्यार्थी प्रणव काळे याची नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी निवड झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा विकास व्हावा म्हणून ‘लोकमत संस्काराचे मोती’ हा शैक्षणिक उपक्रम आयोजित केला जातो. १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१७ या १०० दिवसांच्या कालावधीत स्पर्धा आयोजित केली होती. यातील सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रणवची निवड झाल्याबद्दल शाळेत जाऊन आर्वी येथील लोकमत प्रतिनिधी पुरूषोत्तम नागपूरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका वडनारे व शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून जिल्हानिहाय फक्त एका विद्यार्थ्याची नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी निवड करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातून प्रणव हवाई सफरला जाणार आहे. निवडीबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.